शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 22:32 IST

महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत.

ठळक मुद्देकुठलीच विकासकामे थांबणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत. यावर निश्चितच श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी टीका करीत या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. विकास कामे थांबणार नाही, असे राज्यातील नवनियुक्त मंत्री नितीन राऊत यांनी येथे सांगितले.कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन राऊत पहिल्यांदाच नागपुरात आले. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते रॅलीने दीक्षाभूमीला आले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना वंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीन राऊत म्हणाले, गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने विकासाच्या नावावर विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. केवळ खोटे बोलत राहिले. परंतु शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडी सरकार विदर्भावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. येथील युवक व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही विदर्भाच्या विकासात कुठलीही अडचण येऊ देणार नाही.काँग्रेसची ‘आगेकूच’ प्रारंभराऊत यांनी सांगितले की, त्यांच्या रूपात आंबेडकरी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला काँग्रेसने मंत्री बनवले. त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणाºया बहुजन समाजातील नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले. या नियुक्तीद्वारे कॉँग्रेसने राज्यातील जनतेला समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षतेचा स्पष्ट संदेश दिला आहे. आता भाजपची आगेकूच संपली असून, कॉँग्रेसची आगेकूच प्रारंभ झाली आहे.दाल मे कुछ काला हैभाजपचे ज्येष्ठ नेते अनंत हेगडे यांनी ४० हजार कोटी केंद्राला परत केलेल्या वक्तव्याबाबत नितीन राऊत यांना विचारणा केली असता, हेगडे हे भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ‘दाल मे कुछ काला है’ हे निश्चित. याबाबत फडणवीस यांनीच स्पष्टीकरण द्यावे. शेतकºयांसाठी मिळालेला पैसा दोन दिवसात परत कसा गेला. हे त्यांनी सांगावे, असेही राऊत म्हणाले.

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतMediaमाध्यमे