शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 22:32 IST

महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत.

ठळक मुद्देकुठलीच विकासकामे थांबणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत. यावर निश्चितच श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी टीका करीत या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. विकास कामे थांबणार नाही, असे राज्यातील नवनियुक्त मंत्री नितीन राऊत यांनी येथे सांगितले.कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन राऊत पहिल्यांदाच नागपुरात आले. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते रॅलीने दीक्षाभूमीला आले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना वंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीन राऊत म्हणाले, गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने विकासाच्या नावावर विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. केवळ खोटे बोलत राहिले. परंतु शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडी सरकार विदर्भावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. येथील युवक व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही विदर्भाच्या विकासात कुठलीही अडचण येऊ देणार नाही.काँग्रेसची ‘आगेकूच’ प्रारंभराऊत यांनी सांगितले की, त्यांच्या रूपात आंबेडकरी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला काँग्रेसने मंत्री बनवले. त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणाºया बहुजन समाजातील नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले. या नियुक्तीद्वारे कॉँग्रेसने राज्यातील जनतेला समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षतेचा स्पष्ट संदेश दिला आहे. आता भाजपची आगेकूच संपली असून, कॉँग्रेसची आगेकूच प्रारंभ झाली आहे.दाल मे कुछ काला हैभाजपचे ज्येष्ठ नेते अनंत हेगडे यांनी ४० हजार कोटी केंद्राला परत केलेल्या वक्तव्याबाबत नितीन राऊत यांना विचारणा केली असता, हेगडे हे भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ‘दाल मे कुछ काला है’ हे निश्चित. याबाबत फडणवीस यांनीच स्पष्टीकरण द्यावे. शेतकºयांसाठी मिळालेला पैसा दोन दिवसात परत कसा गेला. हे त्यांनी सांगावे, असेही राऊत म्हणाले.

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतMediaमाध्यमे