शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा

By admin | Updated: November 29, 2015 03:40 IST

देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही.

गेव्ह आवारी : ‘वेगळा विदर्भ किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याख्याननागपूर : देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानुसार विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी शनिवारी केले. जनमंचतर्फे धनवटे सभागृहात आयोजित ‘वेगळा विदर्भ, किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याखान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे सल्लागार शरद पाटील होते. अध्यक्ष अनिल किलोर ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, जनमंचचे सचिव राजीव जगताप आदी व्यासपीठावर होते. विदर्भाच्या मागणीसाठी एक दबाव निर्माण झाला आहे. जनमंचने स्वतंत्र विदर्भाची चळळ हाती घेतली आहे. आपण सर्व विदर्भवादी आहोत. भाजपच्या हातात केंद्र व राज्यातील सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जोर लावला तर विदर्भाची निर्मिती होऊ शकते. या निर्णयाला आमचाही पाठिंबा राहील, अशी ग्वाही आवारी यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५७-५८ च्या सुमारास विदर्भाची चळवळ जोमात होती. काँग्रेसचे नेते विदर्भवादी होते. परंतु यशवतंराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी त्याग करा, असे आवाहन केले. पुढे भाषावादाचा मुद्दा पुढे करून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. विदर्भ स्वतंत्र झाला तर मागास राहील. असे सांगितले जाते. परंतु यात तथ्य नाही. लहानशा स्वार्थासाठी तडजोड न करता नेत्यांची त्याग करण्याची तयारी असावी. आत्मविश्वास बाळगा, विदर्भाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्यास स्वतंत्र विदर्भाच्या निमिर्तीला कोणीही रोखू शकणार नाही. असे मत प्रकाश दुबे यांनी व्यक्त केले.देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनाही स्वतंत्र विदर्भ हवा आहे. शिवसेनेसोबत भाजप फार काळ सत्तेत राहणार नाही. अगामी निवडणुकीपूर्वी २०१८मध्ये स्वतंत्र विदर्भाची घोषणा होईल, असे भाकीत शरद पाटील यांनी केले. अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून जनमंचने विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या कौलात विदर्भातील नागरिक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. परंतु जेव्हाजेव्हा विदर्भाची मागणी पुढे आली तेव्हा तेव्हा या मागणीला बगल देण्यात आल्याचे अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून सांगितले. संचालन सुहास खांडेकर यांनी तर आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)