शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा

By admin | Updated: November 29, 2015 03:40 IST

देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही.

गेव्ह आवारी : ‘वेगळा विदर्भ किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याख्याननागपूर : देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानुसार विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी शनिवारी केले. जनमंचतर्फे धनवटे सभागृहात आयोजित ‘वेगळा विदर्भ, किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याखान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे सल्लागार शरद पाटील होते. अध्यक्ष अनिल किलोर ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, जनमंचचे सचिव राजीव जगताप आदी व्यासपीठावर होते. विदर्भाच्या मागणीसाठी एक दबाव निर्माण झाला आहे. जनमंचने स्वतंत्र विदर्भाची चळळ हाती घेतली आहे. आपण सर्व विदर्भवादी आहोत. भाजपच्या हातात केंद्र व राज्यातील सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जोर लावला तर विदर्भाची निर्मिती होऊ शकते. या निर्णयाला आमचाही पाठिंबा राहील, अशी ग्वाही आवारी यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५७-५८ च्या सुमारास विदर्भाची चळवळ जोमात होती. काँग्रेसचे नेते विदर्भवादी होते. परंतु यशवतंराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी त्याग करा, असे आवाहन केले. पुढे भाषावादाचा मुद्दा पुढे करून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. विदर्भ स्वतंत्र झाला तर मागास राहील. असे सांगितले जाते. परंतु यात तथ्य नाही. लहानशा स्वार्थासाठी तडजोड न करता नेत्यांची त्याग करण्याची तयारी असावी. आत्मविश्वास बाळगा, विदर्भाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्यास स्वतंत्र विदर्भाच्या निमिर्तीला कोणीही रोखू शकणार नाही. असे मत प्रकाश दुबे यांनी व्यक्त केले.देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनाही स्वतंत्र विदर्भ हवा आहे. शिवसेनेसोबत भाजप फार काळ सत्तेत राहणार नाही. अगामी निवडणुकीपूर्वी २०१८मध्ये स्वतंत्र विदर्भाची घोषणा होईल, असे भाकीत शरद पाटील यांनी केले. अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून जनमंचने विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या कौलात विदर्भातील नागरिक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. परंतु जेव्हाजेव्हा विदर्भाची मागणी पुढे आली तेव्हा तेव्हा या मागणीला बगल देण्यात आल्याचे अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून सांगितले. संचालन सुहास खांडेकर यांनी तर आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)