शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विकास मंडळांना राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी विदर्भवादी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 10:23 IST

Nagpur News आता विदर्भवाद्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून थेट राष्ट्रपतींनाच विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी याला दुजोरा देत, मंडळांसंदर्भात याचिका विचाराधीन आहे, असे सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाच्या माध्यमातून अर्ज याचिकेला मिळणार ब‌ळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रश्नावर राजकारण तापले आहे. आता विदर्भवाद्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून थेट राष्ट्रपतींनाच विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी याला दुजोरा देत, मंडळांसंदर्भात याचिका विचाराधीन आहे, असे सांगितले. पुढील सुनावणीदरम्यान यात राष्ट्रपतींना विनंती करणारा अर्जही जोडण्यात येईल, असे अणे यांनी स्पष्ट केले.

विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी गठित विकास मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे. १४ महिन्यांपूर्वीच हे मंडळ अस्तित्वहीन बनले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून या विषयाकडे लक्ष वेधले आहे. मंडळांचा कार्यकाळ संपून बराच कालावधी झाला असल्याने नव्यानेच हे मंडळ गठित करावे लागेल, हे तथ्यही पुढे आले आहे. विकास मंडळाची स्थापना संविधानाचे कलम ३७१ (२) अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्याच आदेशाची गरज असल्याचे लक्षात येताच विदर्भवाद्यांनी कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंडळांच्या कार्यकाळास मंजुरी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे व विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी सांगितले की, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. रोंघे यांच्यानुसार याचिकेत दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली मंडळांचे गठन करणे आणि दुसरी कलम ३७१ (२) मधील तरतुदीनुसार अंमलबजावणीचा अहवाल सादर करणे. आता या याचिकेच्या माध्यमातून मंडळांना मंजुरी देण्यासंदर्भात राष्ट्रपतींनाही विनंती करण्यात येईल.

राष्ट्रपतींनी नवीन आदेश जारी करायला हवेत

राष्ट्रपतींनीच आता नवीन आदेश जारी करण्याची गरज आहे. सध्या याचिकेत दोन प्रमुख मुद्दे आहेत. यात आता राष्ट्रपतींना विनंती करणारा मुद्दाही जोडला जाईल. ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील सुनावणीपूर्वी हे काम पूर्ण केले जाईल.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भ