शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हा तर लोकमताचा विजय : कृपाल तुमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:01 IST

भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवीत केंद्रात सत्तेचा गड सर केला. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवीत विजय संपादित केला. या विजयाबद्दल तुमाने यांच्याशी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवीत केंद्रात सत्तेचा गड सर केला. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवीत विजय संपादित केला. या विजयाबद्दल तुमाने यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : विजयाचे श्रेय कुणाला द्याल?उत्तर : मी मतांनी जिंकलो. मात्र रामटेक मतदार संघातील जनतेने माझे मन जिंकले. मतदार संघातील सामान्य नागरिक व शेतकरी माझ्या विजयाचे शिल्पकार आहेत.प्रश्न : आपल्या विजयात भाजपाचा वाटा किती?उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते अहोरात्र माझ्यासाठी झटले. भाजपच्या आमदारांनी त्यांच्या मतदार संघात मला लीड दिली. युती धर्माचा हा विजय आहे.प्रश्न : दुसरी टर्म मिळेल याची खात्री होती का?उत्तर : २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर पाचही वर्ष मतदारांच्या संपर्कात राहिलो. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीत धावून गेलो. त्यामुळे दुसरी टर्म मिळेल, याचा विश्वास होता.प्रश्न : शेतकऱ्यांसाठी काय करणार ?उत्तर : शेतकरी हा माझा कणा आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मी आधीपासूनच आग्रही राहिलो आहे. संसदेतही शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोललो. सरकारने शेतकऱ्यांच्या हितांची धोरणे आखली आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती निश्चितच बदलेल.प्रश्न : मतदार संघाचा किती विकास झाला?उत्तर : विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गत पाच वर्षांत रामटेक मतदार संघाचा लूक निश्चितच बदलला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा विकास निधीतून मतदार संघात भरपूर कामे झाली. खासदार फंडाचे योग्य नियोेजन केले. माझा विजय विकास कामांची पावती आहे.प्रश्न : पुढील पाच वर्षातील संकल्प?उत्तर : शेतकऱ्यांना बळ देणे, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील जनतेला चांगले उपचार मिळण्यासाठी मतदार संघातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणे.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमानेinterviewमुलाखत