शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हा संपूर्ण समाजाचा विजय -मुकेश चांडक

By admin | Updated: May 6, 2016 03:00 IST

हायकोर्टाने आरोपींची फाशी कायम केल्यामुळे संपूर्ण समाजाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांनी व्यक्त केली.

हायकोर्टाने आरोपींची फाशी कायम केल्यामुळे संपूर्ण समाजाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे भविष्यात अशा घटना होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निर्णयाविरुद्ध आरोपी सर्वोच्च न्यायालयात गेल्यास त्यांची शिक्षा कायम ठेवण्यासाठी आपणही अर्ज सादर करू . प्रकरण वरच्या न्यायालयात आल्यानंतर प्रामुख्याने तपासातील त्रुटीवर बोट ठेवले जाते. यामुळे आरोपींची फाशी कायम राहील की नाही अशी भीती वाटत होती. परंतु, आरोपी हत्या व अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरतील, असा विश्वास होता. बरेचदा फाशी देण्यापूर्वी आरोपीचे वय व गुन्हेगारीचा पूर्व इतिहास लक्षात घेतला जातो. अशा प्रकरणात याला महत्त्व द्यायला नको. आठ वर्षाच्या निरागस मुलाची हत्या करताना आरोपींनी कशाचाच विचार केला नाही. त्यांच्या कुप्रवृत्तीचा बळी ठरलो हे माझे दुर्दैव आहे असे सांगून चांडक यांनी फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले.दहा कोटी रुपयांची मागणी : युगची हत्या केल्यानंतर आरोपींनी डॉ. चांडक यांना दोनदा फोन करून पहिल्यांदा १० कोटी तर, दुसऱ्यांदा ५ कोटी रुपये खंडणी मागितली होती. युग सायंकाळ होऊनही घरी न परतल्यामुळे डॉ. चांडक यांनी त्यापूर्वीच लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे पोलिसांनी अन्य कर्मचाऱ्यांसह राजेशलाही ठाण्यात बोलावले होते. पोलिसांना राजेशच्या चेहऱ्यावरील हावभावात तफावत दिसत होती. यामुळे राजेशवरील शंका बळावली होती. पोलिसांनी कठोरतेने घेतल्यानंतर राजेशने चक्क युगची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.