शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी अन्यायाचे बळी

By admin | Updated: May 11, 2017 02:24 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात

कसा मिळणार न्याय? : ग्वालबन्सीने मारले, सरकारने उद्ध्वस्त केले, भूमाफियाच्या संपत्तीतूनच व्हावे गरिबांचे पुनर्वसन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात उभारलेले अवैध साम्राज्य पोलीस, मनपा आणि नासुप्रने मंगळवारी धडाकेबाज कारवाईत खालसा केले. या कारवाईचे स्वागत व्हायलाच हवे. परंतु या कारवाईत शेकडो गरिबांचे अवघे संसारच उद्ध्वस्त झाले आहे. पोटाला चिमटा काढून पै-पै जमवणारी या झोपडपट्टीतील गरीब जनता दुहेरी अन्यायाची बळी ठरली आहे. यातला पहिला अन्याय ग्वालबन्सीने बक्कळ पैशांच्या मोबदल्यात ही अवैध जमीन या गरिबांच्या माथी मारून केलाय तर दुसरा अन्याय या लोकांंची संसारे उद्ध्वस्त करताना ते कुठे जातील, याचा विचार न करता त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाने केला आहे. दहशतीच्या बळावर ही जमीन ताब्यात घेतल्याचे कळताच कुणीतरी न्यायालयात गेले. न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले अन् बुलडोझर या गरिबांच्या झोपड्यांवर धडकायला लागले. नियमाने सारेच अगदी सनदशीर. पण, असे झोपड्यांवर बुलडोझर धडकविताना घरे-दारे गमावलेली ही माणसे भरउन्हात आपल्या चिल्या-पिल्यांसह कसे जगतील, याचा विचार प्रशासनाने केला नाही. पण, तसा विचार व्हायला पाहिजे. सरकार ग्लालबन्सीच्या अशा शेकडो अवैध जमिनी ताब्यात घेत आहे. या जमिनी विकून या गरिबांचे पुनर्वसन केले गेले पाहिजे. कारण, या अवैध साम्राज्याच्या उभारणीला केवळ हे गरीब दोषी नाहीत. ग्लालबन्सीसारखे माफिया एका रात्रीत जन्माला येत नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी भक्कम राजकीय पाठबळ असते. अनेक आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत विजयासाठी अशा माफियांना जवळ करतात आणि मोबदल्यात त्यांच्या काळ्या धंद्यांना अभय मिळवून देतात. असे नसते तर तब्बल तीन दशकाहून मोठा काळ हे बिनकायद्याचे राज्य चालवणारा ग्लालबन्सी एकाही आमदार, खासदार,लोकप्रतिनिधींना खटकला नसता? यापैकी कुणाचीही ग्लालबन्सीच्या विरोधात बोलण्याची हिंमत का झाली नाही? अनेक पोलीस आयुक्त नागपुरात आले. त्यांचे लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही? सरकार, प्रशासन, पोलीस अशा सर्वांनीच सोयिस्करपणे ग्लालबन्सीच्या या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याची हिंमत वाढली व तो एकामागून एक जमिनी बळकावत गेला. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांचे मात्र विशेष अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी धाडस दाखवित व सर्व दबाव झुगारून सर्व दबाव झुगारून ही कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाच्या या लढाईत पोलिसांना पूर्ण स्वातंत्र दिले. अखेर हे माफियाराज उधळून लावण्यात आले. आता पुढे ग्लालबन्सीचे अवैध साम्राज्य खालसा झाल्याचा आनंद साजरा करतानाच ज्यांची घरे गेली त्यांच्यासाठी ग्लालबन्सीच्या संपत्तीतून नवीन घरे कशी मिळवून देता येतील, याचाही विचार झाला पाहिजे. ही कारवाई इथेच थांबू नये दहशतीच्या बळावर असे अवैध साम्राज्य उभारणारा ग्वालबन्सी नागपुरात एकटाच नाही. त्याच्यासारख्या अनेकांनी गरीब व विवश माणसांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आहे. त्यांनीही जवळच्या राजकारण्यांना धरून आपली बाजू सुरक्षित करून घेतली आहे. अशा भूमाफियांना खणून काढून त्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजे आणि असे करताना कुणी व्होटबँकेचे स्मरण करून देत असेल तर त्यालाही त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. ग्लालबन्सीवरच्या एका कारवाईने हे होणार नाही. त्यासाठी कारवाईची प्रक्रिया सलग चालत राहिली पाहिजे. कुठे आहेत कॅण्डलवाले? एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी व्हेरायटी, संविधान चौकातून कॅण्डल मार्च काढणारे, पेटून उठणारे जागृत समाजसेवक आणि त्यांच्या संघटना आता कुठे आहेत? शेकडो गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असताना अशा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी कॅण्डल मार्च का काढत नाहीत, हा मोठाच प्रश्न आहे. मनपा, एनआयटीने आता तरी दक्ष व्हावे अशा जमिनी बळकवण्याचा या भूमाफियांना संसर्गजन्य आजार झाला आहे. या आजारावर कायमचा उपचार झाला पाहिजे. कारण, काल जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर पुन्हा पाच-दहा वर्षांनी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जेव्हा अशा वस्त्या वसविण्याच्या हालचाली सुरू होतात तेव्हाच मनपा व एनआयटीने दक्ष राहून असा प्रयत्न उधळला पाहिजे.