शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दुहेरी अन्यायाचे बळी

By admin | Updated: May 11, 2017 02:24 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात

कसा मिळणार न्याय? : ग्वालबन्सीने मारले, सरकारने उद्ध्वस्त केले, भूमाफियाच्या संपत्तीतूनच व्हावे गरिबांचे पुनर्वसन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात उभारलेले अवैध साम्राज्य पोलीस, मनपा आणि नासुप्रने मंगळवारी धडाकेबाज कारवाईत खालसा केले. या कारवाईचे स्वागत व्हायलाच हवे. परंतु या कारवाईत शेकडो गरिबांचे अवघे संसारच उद्ध्वस्त झाले आहे. पोटाला चिमटा काढून पै-पै जमवणारी या झोपडपट्टीतील गरीब जनता दुहेरी अन्यायाची बळी ठरली आहे. यातला पहिला अन्याय ग्वालबन्सीने बक्कळ पैशांच्या मोबदल्यात ही अवैध जमीन या गरिबांच्या माथी मारून केलाय तर दुसरा अन्याय या लोकांंची संसारे उद्ध्वस्त करताना ते कुठे जातील, याचा विचार न करता त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाने केला आहे. दहशतीच्या बळावर ही जमीन ताब्यात घेतल्याचे कळताच कुणीतरी न्यायालयात गेले. न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले अन् बुलडोझर या गरिबांच्या झोपड्यांवर धडकायला लागले. नियमाने सारेच अगदी सनदशीर. पण, असे झोपड्यांवर बुलडोझर धडकविताना घरे-दारे गमावलेली ही माणसे भरउन्हात आपल्या चिल्या-पिल्यांसह कसे जगतील, याचा विचार प्रशासनाने केला नाही. पण, तसा विचार व्हायला पाहिजे. सरकार ग्लालबन्सीच्या अशा शेकडो अवैध जमिनी ताब्यात घेत आहे. या जमिनी विकून या गरिबांचे पुनर्वसन केले गेले पाहिजे. कारण, या अवैध साम्राज्याच्या उभारणीला केवळ हे गरीब दोषी नाहीत. ग्लालबन्सीसारखे माफिया एका रात्रीत जन्माला येत नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी भक्कम राजकीय पाठबळ असते. अनेक आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत विजयासाठी अशा माफियांना जवळ करतात आणि मोबदल्यात त्यांच्या काळ्या धंद्यांना अभय मिळवून देतात. असे नसते तर तब्बल तीन दशकाहून मोठा काळ हे बिनकायद्याचे राज्य चालवणारा ग्लालबन्सी एकाही आमदार, खासदार,लोकप्रतिनिधींना खटकला नसता? यापैकी कुणाचीही ग्लालबन्सीच्या विरोधात बोलण्याची हिंमत का झाली नाही? अनेक पोलीस आयुक्त नागपुरात आले. त्यांचे लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही? सरकार, प्रशासन, पोलीस अशा सर्वांनीच सोयिस्करपणे ग्लालबन्सीच्या या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याची हिंमत वाढली व तो एकामागून एक जमिनी बळकावत गेला. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांचे मात्र विशेष अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी धाडस दाखवित व सर्व दबाव झुगारून सर्व दबाव झुगारून ही कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाच्या या लढाईत पोलिसांना पूर्ण स्वातंत्र दिले. अखेर हे माफियाराज उधळून लावण्यात आले. आता पुढे ग्लालबन्सीचे अवैध साम्राज्य खालसा झाल्याचा आनंद साजरा करतानाच ज्यांची घरे गेली त्यांच्यासाठी ग्लालबन्सीच्या संपत्तीतून नवीन घरे कशी मिळवून देता येतील, याचाही विचार झाला पाहिजे. ही कारवाई इथेच थांबू नये दहशतीच्या बळावर असे अवैध साम्राज्य उभारणारा ग्वालबन्सी नागपुरात एकटाच नाही. त्याच्यासारख्या अनेकांनी गरीब व विवश माणसांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आहे. त्यांनीही जवळच्या राजकारण्यांना धरून आपली बाजू सुरक्षित करून घेतली आहे. अशा भूमाफियांना खणून काढून त्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजे आणि असे करताना कुणी व्होटबँकेचे स्मरण करून देत असेल तर त्यालाही त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. ग्लालबन्सीवरच्या एका कारवाईने हे होणार नाही. त्यासाठी कारवाईची प्रक्रिया सलग चालत राहिली पाहिजे. कुठे आहेत कॅण्डलवाले? एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी व्हेरायटी, संविधान चौकातून कॅण्डल मार्च काढणारे, पेटून उठणारे जागृत समाजसेवक आणि त्यांच्या संघटना आता कुठे आहेत? शेकडो गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असताना अशा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी कॅण्डल मार्च का काढत नाहीत, हा मोठाच प्रश्न आहे. मनपा, एनआयटीने आता तरी दक्ष व्हावे अशा जमिनी बळकवण्याचा या भूमाफियांना संसर्गजन्य आजार झाला आहे. या आजारावर कायमचा उपचार झाला पाहिजे. कारण, काल जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर पुन्हा पाच-दहा वर्षांनी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जेव्हा अशा वस्त्या वसविण्याच्या हालचाली सुरू होतात तेव्हाच मनपा व एनआयटीने दक्ष राहून असा प्रयत्न उधळला पाहिजे.