शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

दुहेरी अन्यायाचे बळी

By admin | Updated: May 11, 2017 02:24 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात

कसा मिळणार न्याय? : ग्वालबन्सीने मारले, सरकारने उद्ध्वस्त केले, भूमाफियाच्या संपत्तीतूनच व्हावे गरिबांचे पुनर्वसन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात उभारलेले अवैध साम्राज्य पोलीस, मनपा आणि नासुप्रने मंगळवारी धडाकेबाज कारवाईत खालसा केले. या कारवाईचे स्वागत व्हायलाच हवे. परंतु या कारवाईत शेकडो गरिबांचे अवघे संसारच उद्ध्वस्त झाले आहे. पोटाला चिमटा काढून पै-पै जमवणारी या झोपडपट्टीतील गरीब जनता दुहेरी अन्यायाची बळी ठरली आहे. यातला पहिला अन्याय ग्वालबन्सीने बक्कळ पैशांच्या मोबदल्यात ही अवैध जमीन या गरिबांच्या माथी मारून केलाय तर दुसरा अन्याय या लोकांंची संसारे उद्ध्वस्त करताना ते कुठे जातील, याचा विचार न करता त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाने केला आहे. दहशतीच्या बळावर ही जमीन ताब्यात घेतल्याचे कळताच कुणीतरी न्यायालयात गेले. न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले अन् बुलडोझर या गरिबांच्या झोपड्यांवर धडकायला लागले. नियमाने सारेच अगदी सनदशीर. पण, असे झोपड्यांवर बुलडोझर धडकविताना घरे-दारे गमावलेली ही माणसे भरउन्हात आपल्या चिल्या-पिल्यांसह कसे जगतील, याचा विचार प्रशासनाने केला नाही. पण, तसा विचार व्हायला पाहिजे. सरकार ग्लालबन्सीच्या अशा शेकडो अवैध जमिनी ताब्यात घेत आहे. या जमिनी विकून या गरिबांचे पुनर्वसन केले गेले पाहिजे. कारण, या अवैध साम्राज्याच्या उभारणीला केवळ हे गरीब दोषी नाहीत. ग्लालबन्सीसारखे माफिया एका रात्रीत जन्माला येत नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी भक्कम राजकीय पाठबळ असते. अनेक आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत विजयासाठी अशा माफियांना जवळ करतात आणि मोबदल्यात त्यांच्या काळ्या धंद्यांना अभय मिळवून देतात. असे नसते तर तब्बल तीन दशकाहून मोठा काळ हे बिनकायद्याचे राज्य चालवणारा ग्लालबन्सी एकाही आमदार, खासदार,लोकप्रतिनिधींना खटकला नसता? यापैकी कुणाचीही ग्लालबन्सीच्या विरोधात बोलण्याची हिंमत का झाली नाही? अनेक पोलीस आयुक्त नागपुरात आले. त्यांचे लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही? सरकार, प्रशासन, पोलीस अशा सर्वांनीच सोयिस्करपणे ग्लालबन्सीच्या या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याची हिंमत वाढली व तो एकामागून एक जमिनी बळकावत गेला. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांचे मात्र विशेष अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी धाडस दाखवित व सर्व दबाव झुगारून सर्व दबाव झुगारून ही कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाच्या या लढाईत पोलिसांना पूर्ण स्वातंत्र दिले. अखेर हे माफियाराज उधळून लावण्यात आले. आता पुढे ग्लालबन्सीचे अवैध साम्राज्य खालसा झाल्याचा आनंद साजरा करतानाच ज्यांची घरे गेली त्यांच्यासाठी ग्लालबन्सीच्या संपत्तीतून नवीन घरे कशी मिळवून देता येतील, याचाही विचार झाला पाहिजे. ही कारवाई इथेच थांबू नये दहशतीच्या बळावर असे अवैध साम्राज्य उभारणारा ग्वालबन्सी नागपुरात एकटाच नाही. त्याच्यासारख्या अनेकांनी गरीब व विवश माणसांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आहे. त्यांनीही जवळच्या राजकारण्यांना धरून आपली बाजू सुरक्षित करून घेतली आहे. अशा भूमाफियांना खणून काढून त्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजे आणि असे करताना कुणी व्होटबँकेचे स्मरण करून देत असेल तर त्यालाही त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. ग्लालबन्सीवरच्या एका कारवाईने हे होणार नाही. त्यासाठी कारवाईची प्रक्रिया सलग चालत राहिली पाहिजे. कुठे आहेत कॅण्डलवाले? एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी व्हेरायटी, संविधान चौकातून कॅण्डल मार्च काढणारे, पेटून उठणारे जागृत समाजसेवक आणि त्यांच्या संघटना आता कुठे आहेत? शेकडो गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असताना अशा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी कॅण्डल मार्च का काढत नाहीत, हा मोठाच प्रश्न आहे. मनपा, एनआयटीने आता तरी दक्ष व्हावे अशा जमिनी बळकवण्याचा या भूमाफियांना संसर्गजन्य आजार झाला आहे. या आजारावर कायमचा उपचार झाला पाहिजे. कारण, काल जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर पुन्हा पाच-दहा वर्षांनी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जेव्हा अशा वस्त्या वसविण्याच्या हालचाली सुरू होतात तेव्हाच मनपा व एनआयटीने दक्ष राहून असा प्रयत्न उधळला पाहिजे.