शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी अन्यायाचे बळी

By admin | Updated: May 11, 2017 02:24 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात

कसा मिळणार न्याय? : ग्वालबन्सीने मारले, सरकारने उद्ध्वस्त केले, भूमाफियाच्या संपत्तीतूनच व्हावे गरिबांचे पुनर्वसन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात उभारलेले अवैध साम्राज्य पोलीस, मनपा आणि नासुप्रने मंगळवारी धडाकेबाज कारवाईत खालसा केले. या कारवाईचे स्वागत व्हायलाच हवे. परंतु या कारवाईत शेकडो गरिबांचे अवघे संसारच उद्ध्वस्त झाले आहे. पोटाला चिमटा काढून पै-पै जमवणारी या झोपडपट्टीतील गरीब जनता दुहेरी अन्यायाची बळी ठरली आहे. यातला पहिला अन्याय ग्वालबन्सीने बक्कळ पैशांच्या मोबदल्यात ही अवैध जमीन या गरिबांच्या माथी मारून केलाय तर दुसरा अन्याय या लोकांंची संसारे उद्ध्वस्त करताना ते कुठे जातील, याचा विचार न करता त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाने केला आहे. दहशतीच्या बळावर ही जमीन ताब्यात घेतल्याचे कळताच कुणीतरी न्यायालयात गेले. न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले अन् बुलडोझर या गरिबांच्या झोपड्यांवर धडकायला लागले. नियमाने सारेच अगदी सनदशीर. पण, असे झोपड्यांवर बुलडोझर धडकविताना घरे-दारे गमावलेली ही माणसे भरउन्हात आपल्या चिल्या-पिल्यांसह कसे जगतील, याचा विचार प्रशासनाने केला नाही. पण, तसा विचार व्हायला पाहिजे. सरकार ग्लालबन्सीच्या अशा शेकडो अवैध जमिनी ताब्यात घेत आहे. या जमिनी विकून या गरिबांचे पुनर्वसन केले गेले पाहिजे. कारण, या अवैध साम्राज्याच्या उभारणीला केवळ हे गरीब दोषी नाहीत. ग्लालबन्सीसारखे माफिया एका रात्रीत जन्माला येत नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी भक्कम राजकीय पाठबळ असते. अनेक आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत विजयासाठी अशा माफियांना जवळ करतात आणि मोबदल्यात त्यांच्या काळ्या धंद्यांना अभय मिळवून देतात. असे नसते तर तब्बल तीन दशकाहून मोठा काळ हे बिनकायद्याचे राज्य चालवणारा ग्लालबन्सी एकाही आमदार, खासदार,लोकप्रतिनिधींना खटकला नसता? यापैकी कुणाचीही ग्लालबन्सीच्या विरोधात बोलण्याची हिंमत का झाली नाही? अनेक पोलीस आयुक्त नागपुरात आले. त्यांचे लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही? सरकार, प्रशासन, पोलीस अशा सर्वांनीच सोयिस्करपणे ग्लालबन्सीच्या या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याची हिंमत वाढली व तो एकामागून एक जमिनी बळकावत गेला. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांचे मात्र विशेष अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी धाडस दाखवित व सर्व दबाव झुगारून सर्व दबाव झुगारून ही कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाच्या या लढाईत पोलिसांना पूर्ण स्वातंत्र दिले. अखेर हे माफियाराज उधळून लावण्यात आले. आता पुढे ग्लालबन्सीचे अवैध साम्राज्य खालसा झाल्याचा आनंद साजरा करतानाच ज्यांची घरे गेली त्यांच्यासाठी ग्लालबन्सीच्या संपत्तीतून नवीन घरे कशी मिळवून देता येतील, याचाही विचार झाला पाहिजे. ही कारवाई इथेच थांबू नये दहशतीच्या बळावर असे अवैध साम्राज्य उभारणारा ग्वालबन्सी नागपुरात एकटाच नाही. त्याच्यासारख्या अनेकांनी गरीब व विवश माणसांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आहे. त्यांनीही जवळच्या राजकारण्यांना धरून आपली बाजू सुरक्षित करून घेतली आहे. अशा भूमाफियांना खणून काढून त्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजे आणि असे करताना कुणी व्होटबँकेचे स्मरण करून देत असेल तर त्यालाही त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. ग्लालबन्सीवरच्या एका कारवाईने हे होणार नाही. त्यासाठी कारवाईची प्रक्रिया सलग चालत राहिली पाहिजे. कुठे आहेत कॅण्डलवाले? एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी व्हेरायटी, संविधान चौकातून कॅण्डल मार्च काढणारे, पेटून उठणारे जागृत समाजसेवक आणि त्यांच्या संघटना आता कुठे आहेत? शेकडो गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असताना अशा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी कॅण्डल मार्च का काढत नाहीत, हा मोठाच प्रश्न आहे. मनपा, एनआयटीने आता तरी दक्ष व्हावे अशा जमिनी बळकवण्याचा या भूमाफियांना संसर्गजन्य आजार झाला आहे. या आजारावर कायमचा उपचार झाला पाहिजे. कारण, काल जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर पुन्हा पाच-दहा वर्षांनी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जेव्हा अशा वस्त्या वसविण्याच्या हालचाली सुरू होतात तेव्हाच मनपा व एनआयटीने दक्ष राहून असा प्रयत्न उधळला पाहिजे.