शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

विहिंपची मागणी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी

By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 19:04 IST

श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हणल्यावरून टीका : कॉंग्रेसकडून जाणुनबुजून हिंदूंचा वारंवार अपमान

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे वक्तव्य अमेरिकेत केले होते. त्यावरून विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी यावरून राहुल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी देशाची व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी ते नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

अमेरिकेत राहुल गांधी यांनी नुकतीच मुलाखत दिली व त्यात त्यांनी भारतीय इतिहासातील अनेक गोष्टींना काल्पनिक सांगितले. त्यांनी श्रीराम यांनाही एक काल्पनिक पात्र म्हटले आहे. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन हिंदू आस्थेचा अपमान केला आहे. रामसेतूचे प्रकरण न्यायालयात असतानादेखील काँग्रेसने तशीच भूमिका घेत श्रीराम यांना काल्पनिक पात्र म्हटले होते. काँग्रेस वारंवार जाणूनबुजून असे करत असून करत आहे नियोजनबद्ध षडयंत्राअंतर्गत हिंदू धर्मियांचा अपमान करण्यात येत आहे, असा आरोप परांडे यांनी लावला.

यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला व देशाच्या सीमेवरील स्थितीवरदेखील भाष्य केले. पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून निर्दोषांची हत्या करण्यात आली.. त्यामागे ही जिहादी मानसिकता कारणीभूत दिसून येत आहे. या जिहादी हिंसेला ठेचण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी मॉक ड्रीलचे आवाहन केले आहे. पूर्ण हिंदू समाजाने ही बाब गांभीर्याने घेऊन त्याचे पालन करावे. पाकिस्तानचे अनेक छुपे एजंट आपल्या देशात आहे.. ते आमच्यात राहून काम करत असल्याने हिंदू समाजाने सावध राहण्याची गरज आहे, असे परांडे म्हणाले.

हिंदू मंदिरांवर हिंदूंचेच नियंत्रण हवेविश्व हिंदू परिषदेने हिंदू मंदिरांवर हिंदू नियंत्रणाची मागणी गेले अनेक महिने लावून धरली आहे.. त्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना विहिंपचे पदाधिकारी भेटणार आहे. समाजातदेखील त्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत, अशी माहिती मिलिंद परांडे यांनी दिली.

महाराष्ट्रात गौहत्या विरोधी कायदा हवागौरक्षण हा संवेदनशील आणि तेवढाच क्लिष्ट विषय आहे. शेतीची संपूर्ण प्रक्रिया रासायनिक खतांवर आधारित झाल्यामुळे सध्या गौरक्षण करणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी शेतीची संपूर्ण प्रक्रिया गौआधारित करावी लागेल. मात्र तोवर खाटकाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्याचे प्रयत्नही करावे लागतील. महाराष्ट्रात गौ हत्येच्या वाढत्या प्रकरणासंदर्भात आम्ही जनजागरण करू आणि योग्य कायदा तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असे परांडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस