शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विहिंपची मागणी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी

By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 19:04 IST

श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हणल्यावरून टीका : कॉंग्रेसकडून जाणुनबुजून हिंदूंचा वारंवार अपमान

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे वक्तव्य अमेरिकेत केले होते. त्यावरून विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी यावरून राहुल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी देशाची व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी ते नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

अमेरिकेत राहुल गांधी यांनी नुकतीच मुलाखत दिली व त्यात त्यांनी भारतीय इतिहासातील अनेक गोष्टींना काल्पनिक सांगितले. त्यांनी श्रीराम यांनाही एक काल्पनिक पात्र म्हटले आहे. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन हिंदू आस्थेचा अपमान केला आहे. रामसेतूचे प्रकरण न्यायालयात असतानादेखील काँग्रेसने तशीच भूमिका घेत श्रीराम यांना काल्पनिक पात्र म्हटले होते. काँग्रेस वारंवार जाणूनबुजून असे करत असून करत आहे नियोजनबद्ध षडयंत्राअंतर्गत हिंदू धर्मियांचा अपमान करण्यात येत आहे, असा आरोप परांडे यांनी लावला.

यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला व देशाच्या सीमेवरील स्थितीवरदेखील भाष्य केले. पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून निर्दोषांची हत्या करण्यात आली.. त्यामागे ही जिहादी मानसिकता कारणीभूत दिसून येत आहे. या जिहादी हिंसेला ठेचण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी मॉक ड्रीलचे आवाहन केले आहे. पूर्ण हिंदू समाजाने ही बाब गांभीर्याने घेऊन त्याचे पालन करावे. पाकिस्तानचे अनेक छुपे एजंट आपल्या देशात आहे.. ते आमच्यात राहून काम करत असल्याने हिंदू समाजाने सावध राहण्याची गरज आहे, असे परांडे म्हणाले.

हिंदू मंदिरांवर हिंदूंचेच नियंत्रण हवेविश्व हिंदू परिषदेने हिंदू मंदिरांवर हिंदू नियंत्रणाची मागणी गेले अनेक महिने लावून धरली आहे.. त्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना विहिंपचे पदाधिकारी भेटणार आहे. समाजातदेखील त्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत, अशी माहिती मिलिंद परांडे यांनी दिली.

महाराष्ट्रात गौहत्या विरोधी कायदा हवागौरक्षण हा संवेदनशील आणि तेवढाच क्लिष्ट विषय आहे. शेतीची संपूर्ण प्रक्रिया रासायनिक खतांवर आधारित झाल्यामुळे सध्या गौरक्षण करणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी शेतीची संपूर्ण प्रक्रिया गौआधारित करावी लागेल. मात्र तोवर खाटकाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्याचे प्रयत्नही करावे लागतील. महाराष्ट्रात गौ हत्येच्या वाढत्या प्रकरणासंदर्भात आम्ही जनजागरण करू आणि योग्य कायदा तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असे परांडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस