शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विहिंपची मागणी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी

By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 19:04 IST

श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हणल्यावरून टीका : कॉंग्रेसकडून जाणुनबुजून हिंदूंचा वारंवार अपमान

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे वक्तव्य अमेरिकेत केले होते. त्यावरून विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी यावरून राहुल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी देशाची व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी ते नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

अमेरिकेत राहुल गांधी यांनी नुकतीच मुलाखत दिली व त्यात त्यांनी भारतीय इतिहासातील अनेक गोष्टींना काल्पनिक सांगितले. त्यांनी श्रीराम यांनाही एक काल्पनिक पात्र म्हटले आहे. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन हिंदू आस्थेचा अपमान केला आहे. रामसेतूचे प्रकरण न्यायालयात असतानादेखील काँग्रेसने तशीच भूमिका घेत श्रीराम यांना काल्पनिक पात्र म्हटले होते. काँग्रेस वारंवार जाणूनबुजून असे करत असून करत आहे नियोजनबद्ध षडयंत्राअंतर्गत हिंदू धर्मियांचा अपमान करण्यात येत आहे, असा आरोप परांडे यांनी लावला.

यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला व देशाच्या सीमेवरील स्थितीवरदेखील भाष्य केले. पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून निर्दोषांची हत्या करण्यात आली.. त्यामागे ही जिहादी मानसिकता कारणीभूत दिसून येत आहे. या जिहादी हिंसेला ठेचण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी मॉक ड्रीलचे आवाहन केले आहे. पूर्ण हिंदू समाजाने ही बाब गांभीर्याने घेऊन त्याचे पालन करावे. पाकिस्तानचे अनेक छुपे एजंट आपल्या देशात आहे.. ते आमच्यात राहून काम करत असल्याने हिंदू समाजाने सावध राहण्याची गरज आहे, असे परांडे म्हणाले.

हिंदू मंदिरांवर हिंदूंचेच नियंत्रण हवेविश्व हिंदू परिषदेने हिंदू मंदिरांवर हिंदू नियंत्रणाची मागणी गेले अनेक महिने लावून धरली आहे.. त्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना विहिंपचे पदाधिकारी भेटणार आहे. समाजातदेखील त्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत, अशी माहिती मिलिंद परांडे यांनी दिली.

महाराष्ट्रात गौहत्या विरोधी कायदा हवागौरक्षण हा संवेदनशील आणि तेवढाच क्लिष्ट विषय आहे. शेतीची संपूर्ण प्रक्रिया रासायनिक खतांवर आधारित झाल्यामुळे सध्या गौरक्षण करणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी शेतीची संपूर्ण प्रक्रिया गौआधारित करावी लागेल. मात्र तोवर खाटकाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्याचे प्रयत्नही करावे लागतील. महाराष्ट्रात गौ हत्येच्या वाढत्या प्रकरणासंदर्भात आम्ही जनजागरण करू आणि योग्य कायदा तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असे परांडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस