शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:08 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची दिशाभूल केली आहे. आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, कृषी क्षेत्रावरील संकटामुळे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, बँकिंग क्षेत्रापुढील संकट, महिलांची सुरक्षा असे गंभीर प्रश्न देशापुढे उभे ठाकले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अ‍ॅड. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.मागील ५० वर्षातील बेरोजगारीचा उच्चाक गाठला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे समाजात अशांतता निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खासगी गुंतवणुकीपोटी औद्योगिक विकास घटला आहे. उत्पादनक्षेत्रातील वाढ उणे झाली आहे. नोटबंदीमुळे देशाचा विकास दर २ टक्केहून अधिक कमी झाला. जीएसटीच्या माध्यमातून लोकांवर कर आकारला जात आहे. नरेंद्र मोदी यांना लोकांनी मोठ्या अपेक्षा ठेवून निवडून दिले होते. परंतु चुकीच्या धोरणामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप पवन खेडा यांनी केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरात काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.फोन टॅप प्रकरणाची चौकशी व्हावी‘पेगॅसस’ या इस्रायली स्पायवेअरचा वापर करून काही अज्ञात लोकांनी जगभरात हेरगिरी केली. इस्रायली कंपनीने आम्ही सरकारी कंपनीलाच स्पायवेअरचा वापर करू देत असल्याचे स्पष्ट केले आहे. हा गंभीर प्रकार आहे. भारतातील कुणाकुणाचे फोन टॅप करण्यात आले याची चौकशी व्हावी, अशी मागणी पवन खेडा यांनी केली.राज्यात स्थिर सरकार गठित व्हावेराज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.सरकारमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याची हिंमत नाही. दुसरीकडे राज्यात नवीन सरकार गठित होण्याला विलंब होत आहे. हा प्रकार देशातील जनता बघत आहे. राज्यात स्थिर सरकार गठित व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे. याबाबत लवकरच स्थिती स्पष्ट होईल. अशी अपेक्षा पवन खेडा यांनी व्यक्त केली. निवडणुकीत आयारामांना लोकांनी धडा शिकवल्याचे सातारा येथील निकालावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMediaमाध्यमे