शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

वेकोलिचा दुर्लक्षितपणा, आमनदीचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास ...

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास कोंडतो आहे. कोळसा खदानीतून निघालेला गाळ, तेलमिश्रित रसायने आणि नदीपात्रात वाढलेल्या काटेरी-झुडपांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत वेकोलिने केराची टोपलीच दाखविली असून लोकप्रतिनिधींकडेसुद्धा समस्या मांडूनही कवडीचा उपयोग झाला नाही, असा संताप शेतकऱ्यांचा आहे.

उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या वेकोलि पुलापासून ते कोटगाव पुलापर्यंतच्या ३ किलोमीटर परिसरात ही समस्या भेडसावत आहे. उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या नदीकिनारी आहेत. नदीपात्रात गाळ, झाडेझुडपे यांची बेसुमार वाढ झाल्यामुळे आमनदीच्या पुराच्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. नदीचे पात्र उथळ झाले आहे. यामुळे पावसाळ्यात कितीही मोठा पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वैनगंगेच्या दिशेने न जाता अनेक ठिकाणी थांबतो. शिवाय कोळसा खदानीच्या तेलमिश्रित रासायनिक तवंग पाण्यावर दिसून येतात. पाणी थोपल्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहते. पिके सतत पाण्याखाली राहत असल्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत असते. यावर्षी सुद्धा पावसाळा तोंडावर आहे. अद्याप वेकोलिने कोणतेही पाऊल उचलले नाही. मागील अनेक वर्षांपासून ही बाब शेतकरी वेकोलिच्या अधिकाऱ्यांजवळ मांडत आहेत. अनेकदा निवेदने, चर्चा करूनही वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. वेकोलिने तातडीने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधींनी योग्य भूमिका पार पाडावी, अशी मागणी अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, दिलीप पोंगडे, उमेश कटरे, श्याम गिरडकर, राहुल गिरडकर, सुनील चिचमलकर, डोमाजी लांबट, माला भुसारी, श्रीराम मेंढुले, सुजित भुजाडे, मंगेश कुर्जेकर, राजू बंड, प्रकाश पोंगडे, सुनील चौधरी, अशोक चौधरी, प्रकाश पोंगडे, शंकर गिरडकर, ईश्वर कुर्जेकर, सुरज चाफले आदींसह असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून वेकोलिच्या निष्काळजीपणाचा फटका बसत असल्याचा आरोपही केला आहे.

निसर्गाशी दोन हात

एक नव्हे अनेकदा नैसर्गिक आमनदीचे वळण वेकोलिने वळविले. कोळसा उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी आणि खदानीचे आयुष्य वाढविण्यासाठी वेकोलिने करोडो रुपयांचा निधी ओतून निसर्गाशी दोन हात केले. आमनदीचे वळणकाम झाल्यानंतर वेकोलिने नदीकडे दुर्लक्ष केले. आमनदी शिरपूर-कान्हवा पासूनच्या वळणावरच जाम झाली. नदीपात्रातच गाळ, झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आमनदीचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला.

--

मागील पाच ते सात वर्षांपासून सोयाबीन, धान, कापूस आदी पिकांमध्ये आमनदीच्या पात्रातील पाणी शेतात साचते. यामुळे पिके सडतात. अतोनात खर्च करूनही दरवर्षी आमचे नुकसान होत आहे. तातडीने नदीचा उपसा करावा. विपरीत परिस्थितीत वेकोलिने शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही.

अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, शेतकरी.

-