शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वेकोलिचा दुर्लक्षितपणा, आमनदीचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास ...

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास कोंडतो आहे. कोळसा खदानीतून निघालेला गाळ, तेलमिश्रित रसायने आणि नदीपात्रात वाढलेल्या काटेरी-झुडपांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत वेकोलिने केराची टोपलीच दाखविली असून लोकप्रतिनिधींकडेसुद्धा समस्या मांडूनही कवडीचा उपयोग झाला नाही, असा संताप शेतकऱ्यांचा आहे.

उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या वेकोलि पुलापासून ते कोटगाव पुलापर्यंतच्या ३ किलोमीटर परिसरात ही समस्या भेडसावत आहे. उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या नदीकिनारी आहेत. नदीपात्रात गाळ, झाडेझुडपे यांची बेसुमार वाढ झाल्यामुळे आमनदीच्या पुराच्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. नदीचे पात्र उथळ झाले आहे. यामुळे पावसाळ्यात कितीही मोठा पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वैनगंगेच्या दिशेने न जाता अनेक ठिकाणी थांबतो. शिवाय कोळसा खदानीच्या तेलमिश्रित रासायनिक तवंग पाण्यावर दिसून येतात. पाणी थोपल्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहते. पिके सतत पाण्याखाली राहत असल्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत असते. यावर्षी सुद्धा पावसाळा तोंडावर आहे. अद्याप वेकोलिने कोणतेही पाऊल उचलले नाही. मागील अनेक वर्षांपासून ही बाब शेतकरी वेकोलिच्या अधिकाऱ्यांजवळ मांडत आहेत. अनेकदा निवेदने, चर्चा करूनही वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. वेकोलिने तातडीने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधींनी योग्य भूमिका पार पाडावी, अशी मागणी अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, दिलीप पोंगडे, उमेश कटरे, श्याम गिरडकर, राहुल गिरडकर, सुनील चिचमलकर, डोमाजी लांबट, माला भुसारी, श्रीराम मेंढुले, सुजित भुजाडे, मंगेश कुर्जेकर, राजू बंड, प्रकाश पोंगडे, सुनील चौधरी, अशोक चौधरी, प्रकाश पोंगडे, शंकर गिरडकर, ईश्वर कुर्जेकर, सुरज चाफले आदींसह असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून वेकोलिच्या निष्काळजीपणाचा फटका बसत असल्याचा आरोपही केला आहे.

निसर्गाशी दोन हात

एक नव्हे अनेकदा नैसर्गिक आमनदीचे वळण वेकोलिने वळविले. कोळसा उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी आणि खदानीचे आयुष्य वाढविण्यासाठी वेकोलिने करोडो रुपयांचा निधी ओतून निसर्गाशी दोन हात केले. आमनदीचे वळणकाम झाल्यानंतर वेकोलिने नदीकडे दुर्लक्ष केले. आमनदी शिरपूर-कान्हवा पासूनच्या वळणावरच जाम झाली. नदीपात्रातच गाळ, झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आमनदीचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला.

--

मागील पाच ते सात वर्षांपासून सोयाबीन, धान, कापूस आदी पिकांमध्ये आमनदीच्या पात्रातील पाणी शेतात साचते. यामुळे पिके सडतात. अतोनात खर्च करूनही दरवर्षी आमचे नुकसान होत आहे. तातडीने नदीचा उपसा करावा. विपरीत परिस्थितीत वेकोलिने शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही.

अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, शेतकरी.

-