शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचा दुर्लक्षितपणा, आमनदीचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास ...

उमरेड : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून उगम पावलेल्या आणि वैनगंगेच्या पाच नद्यांच्या संगमांपैकी एक असलेल्या आमनदीचा मागील काही वर्षांपासून श्वास कोंडतो आहे. कोळसा खदानीतून निघालेला गाळ, तेलमिश्रित रसायने आणि नदीपात्रात वाढलेल्या काटेरी-झुडपांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत वेकोलिने केराची टोपलीच दाखविली असून लोकप्रतिनिधींकडेसुद्धा समस्या मांडूनही कवडीचा उपयोग झाला नाही, असा संताप शेतकऱ्यांचा आहे.

उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या वेकोलि पुलापासून ते कोटगाव पुलापर्यंतच्या ३ किलोमीटर परिसरात ही समस्या भेडसावत आहे. उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या नदीकिनारी आहेत. नदीपात्रात गाळ, झाडेझुडपे यांची बेसुमार वाढ झाल्यामुळे आमनदीच्या पुराच्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. नदीचे पात्र उथळ झाले आहे. यामुळे पावसाळ्यात कितीही मोठा पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वैनगंगेच्या दिशेने न जाता अनेक ठिकाणी थांबतो. शिवाय कोळसा खदानीच्या तेलमिश्रित रासायनिक तवंग पाण्यावर दिसून येतात. पाणी थोपल्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहते. पिके सतत पाण्याखाली राहत असल्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत असते. यावर्षी सुद्धा पावसाळा तोंडावर आहे. अद्याप वेकोलिने कोणतेही पाऊल उचलले नाही. मागील अनेक वर्षांपासून ही बाब शेतकरी वेकोलिच्या अधिकाऱ्यांजवळ मांडत आहेत. अनेकदा निवेदने, चर्चा करूनही वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. वेकोलिने तातडीने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधींनी योग्य भूमिका पार पाडावी, अशी मागणी अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, दिलीप पोंगडे, उमेश कटरे, श्याम गिरडकर, राहुल गिरडकर, सुनील चिचमलकर, डोमाजी लांबट, माला भुसारी, श्रीराम मेंढुले, सुजित भुजाडे, मंगेश कुर्जेकर, राजू बंड, प्रकाश पोंगडे, सुनील चौधरी, अशोक चौधरी, प्रकाश पोंगडे, शंकर गिरडकर, ईश्वर कुर्जेकर, सुरज चाफले आदींसह असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून वेकोलिच्या निष्काळजीपणाचा फटका बसत असल्याचा आरोपही केला आहे.

निसर्गाशी दोन हात

एक नव्हे अनेकदा नैसर्गिक आमनदीचे वळण वेकोलिने वळविले. कोळसा उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी आणि खदानीचे आयुष्य वाढविण्यासाठी वेकोलिने करोडो रुपयांचा निधी ओतून निसर्गाशी दोन हात केले. आमनदीचे वळणकाम झाल्यानंतर वेकोलिने नदीकडे दुर्लक्ष केले. आमनदी शिरपूर-कान्हवा पासूनच्या वळणावरच जाम झाली. नदीपात्रातच गाळ, झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आमनदीचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला.

--

मागील पाच ते सात वर्षांपासून सोयाबीन, धान, कापूस आदी पिकांमध्ये आमनदीच्या पात्रातील पाणी शेतात साचते. यामुळे पिके सडतात. अतोनात खर्च करूनही दरवर्षी आमचे नुकसान होत आहे. तातडीने नदीचा उपसा करावा. विपरीत परिस्थितीत वेकोलिने शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही.

अ‍ॅड. भैयाजी पोंगडे, शेतकरी.

-