शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वेकाेलिने ‘एसटीपी’ची व्यवस्था करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : वेकाेलि कामठी उपक्षेत्रांतर्गतच्या कामठी व इंदर खुल्या खाणीतून काेळसा उत्खनन करताना दूषित पाणी कन्हान ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : वेकाेलि कामठी उपक्षेत्रांतर्गतच्या कामठी व इंदर खुल्या खाणीतून काेळसा उत्खनन करताना दूषित पाणी कन्हान नदीपात्रात साेडले जाते. यामुळे नदीपात्र प्रदूषित हाेत आहे. शिवाय, या नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हाेत असल्याने नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे वेकाेलि प्रशासनाने नदीपात्रात दूषित पाणी साेडणे थांबवून त्याठिकाणी दाेन एसटीपी (सिवेज ट्रीटमेंट प्लांट) लावून साेडावे, अशी मागणी माजी खा. प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत कामठी उपक्षेत्र प्रबंधक सुरेश तळणकर यांना निवेदन दिले आहे.

कामठी व इंदर खुली खाणीतून कोळसा उत्खनन करताना दररोज दूषित पाणी बाहेर फेकले जाते. हे पाणी कांद्री, सुरेशनगर, धरमनगर, पिपरीजवळील नाल्याने घाण व दूषित पाणी कन्हान नदीपात्रात बिनधास्तपणे सोडल्या जात आहे. यामुळे कन्हान नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. या नदीतून कन्हान, कांद्री व परिसरातील नागरिकांना फक्त ब्लिचिंग टाकून पिण्याकरिता पाणीपुरवठा केला जाताे. त्यामुळे नागरिकांना आजाराची शक्यता बळावली आहे. वेकोलिने कोळसा खाणीचे दूषित पाणी नदीपात्रात सोडणे त्वरित थांबवावे. तसेच कन्हान नदीत मिळणाऱ्या कामठी खुली खाणीच्या धरमनगर पिपरीजवळील नाल्यावर आणि इंदर खुली खाणीच्या गाडेघाट जवळील नाल्यावर असे दोन एसटीपी लावून पाणी स्वच्छ करून साेडले जावे, जेणेकरून कन्हान नदी प्रदूषित हाेणार नाही तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळता येईल. यावेळी माजी खासदार तथा ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्यासह दिलीप राईकवार, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, प्रमोद निमजे, सिन्नू विणेवार, कमलसिंग यादव, अजय ठाकरे, प्रवीण गोडे, आकाश पंडितकर, रवींद्र दुपारे, रूपेश सातपुते, किशोर बावनकुळे, विजय तिवारी, कमल यादव, मनीष गोल्लर, नीलेश गाढवे, केतन भिवगडे, श्याम मस्के आदी उपस्थित होते.