शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 11:06 IST

या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे.

ठळक मुद्देआवश्यकता १६१० वाहनांची, आजवर २०० वाहनेच जमा -तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येत्या २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघासाठी मतदान होऊ घातले आहे. या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे. विनंती करुनही वाहन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे येत्या काळात अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही देखील करण्याची तयारी निवडणूक विभागाने चालविली असल्याची माहिती आहे.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १६१० वाहनांची आवश्यक आहे. यात जीप, बस, ट्रक, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. यात काही वाहने कंत्राटी पध्दतीनेही घेण्यात येणार असून काही वाहने शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. आजवर विभागाकडे जवळपास २०० वाहन जमा झाले असल्याची माहिती आहे. अनेक शासकीय विभागांच्या प्रमुखांना वारंवार पत्रव्यवहार व फोन करुनही त्यांच्याकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम, वनविभागातील जवळपास १०० बड्या अधिकाऱ्यांकडून वाहन देण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे याविरुध्द वाहन जप्तीची मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान त्या अधिकाऱ्यांची वाहने भर रस्त्यात जप्त करुन त्यांना आहे त्या ठिकाणीच वाहनातून खाली उतरवून वाहन निवडणूक प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने आता प्रशासनाने थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने जप्तीची कारवाई निवडणूक प्रशासनाकडून सुरूच आहेत. तर ज्या ज्या विभागांकडून अद्यापही वाहने जमा करण्यात आली नाही, त्यांना लवकरात लवकर निवडणूक प्रशासनाकडे (विभागाकडे) वाहन जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा निवडणूक विभागाने वाहन जप्तीसाठी जिल्ह्यात सहा पथक तयार केले असून यात वाहतुक पोलीस, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक