शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 11:06 IST

या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे.

ठळक मुद्देआवश्यकता १६१० वाहनांची, आजवर २०० वाहनेच जमा -तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येत्या २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघासाठी मतदान होऊ घातले आहे. या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे. विनंती करुनही वाहन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे येत्या काळात अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही देखील करण्याची तयारी निवडणूक विभागाने चालविली असल्याची माहिती आहे.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १६१० वाहनांची आवश्यक आहे. यात जीप, बस, ट्रक, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. यात काही वाहने कंत्राटी पध्दतीनेही घेण्यात येणार असून काही वाहने शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. आजवर विभागाकडे जवळपास २०० वाहन जमा झाले असल्याची माहिती आहे. अनेक शासकीय विभागांच्या प्रमुखांना वारंवार पत्रव्यवहार व फोन करुनही त्यांच्याकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम, वनविभागातील जवळपास १०० बड्या अधिकाऱ्यांकडून वाहन देण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे याविरुध्द वाहन जप्तीची मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान त्या अधिकाऱ्यांची वाहने भर रस्त्यात जप्त करुन त्यांना आहे त्या ठिकाणीच वाहनातून खाली उतरवून वाहन निवडणूक प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने आता प्रशासनाने थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने जप्तीची कारवाई निवडणूक प्रशासनाकडून सुरूच आहेत. तर ज्या ज्या विभागांकडून अद्यापही वाहने जमा करण्यात आली नाही, त्यांना लवकरात लवकर निवडणूक प्रशासनाकडे (विभागाकडे) वाहन जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा निवडणूक विभागाने वाहन जप्तीसाठी जिल्ह्यात सहा पथक तयार केले असून यात वाहतुक पोलीस, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक