शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्या तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:22 IST

जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देतिघांना अटक : जरीपटका परिसरात खळबळ, जुन्या वैमनस्यातून घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.समीर ऊर्फ सोनु शहा (२१) रा. वनदेवीनगर असे मृताचे नाव आहे. जरीपटका पोलिसांनी खुनाचे सूत्रधार ऋषभ राजू खापेकर (१९) रा. बिनाकी मंगळवारी, शेख फय्याज ऊर्फ बाबू साहब (२१) रा. यशोधरानगर आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास अटक केली आहे. सोनू आठवडी बाजारात टमाटर विकत होता. त्याची ऋषभसोबत मैत्री होती. तीन महिन्यापूर्वी पैशावरून दोघात वाद झाला होता. वाद झाल्यानंतर दोन दिवसांनी ऋषभ, बाबू साहबला घेऊन सोनूच्या घरी आला होता. त्यांनी सोनूवर हल्ला केला होता. मदतीसाठी आलेल्या सोनूच्या भावालाही त्यांनी जखमी केले होते.या हल्ल्यात बाबू साहबही गंभीर जखमी झाला होता. याबाबत यशोधरानगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर आरोपींचा सोनूसोबत वाद सुरू होता. सोनू आपल्याला इजा पोहोचवू शकतो, अशी आरोपींना भीती होती. सोनू हा वाद विसरला होता. आरोपी अनेक दिवसांपासून सोनूला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. मंगळवारी सोनू आठवडी बाजारात टमाटर विकत होता. रात्री १०.३० वाजता बाजार बंद होण्याची वेळ झाल्यामुळे सोनू आपल्या मित्रासोबत बसला होता. त्याचवेळी एक युवक सोनूला बोलविण्यासाठी आला. सोनू त्याच्यासोबत सागर बीअर बारकडे गेला.याच दरम्यान आरोपीही त्याचा शोध घेत तेथे पोहोचले. त्यांनी सोनूला घेरले. त्याचा जागेवरच शस्त्रांनी खून केला. या घटनेमुळे बाजारात एकच खळबळ उडाली. भाजी विक्रेते सामान गोळा करून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोनूला मेयो रुग्णालयात पोहोचविले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋषभ खापेकर रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ विकतो. बाबू साहब डोबीचा गुन्हेगार आहे. दोघांविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हल्ला करताना आरोपींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषभ आणि बाबू साहब सात ते आठ साथीदारांसह सोनूला शोधत होते. परंतु पोलीस तीन आरोपी असल्याचे सांगत आहेत. सोनूच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.