शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मंगळवारी बाजारात भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आठवडी बाजारात दुकानाच्या जागेच्या वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार भावांनी एका भाजी विक्रेत्यावर शस्त्राचे सपासप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आठवडी बाजारात दुकानाच्या जागेच्या वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार भावांनी एका भाजी विक्रेत्यावर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याची हत्या केली. सदरमधील मंगळवारी बाजारात शेकडो लोकांसमोर ही थरारक घटना घडली. अक्षय किशोर निर्मले (वय २३) असे मृताचे नाव आहे. तर, त्याची हत्या करणाऱ्यांची नावे निखिल वर्मा, रितेश वर्मा राजू वर्मा आणि सुमित वर्मा अशी आहेी. आरोपी दोन सख्खे तर दोन चुलत भाऊ आहेत. ते कळमन्यातील रहिवासी असून मंगळवारी बाजारात ते भाजीचे दुकान तसेच चहाचा ठेला लावतात.

आरोपी वर्मा बंधूंची आठवडी बाजारात प्रचंड दहशत आहे. ते बाजारात जागा देऊन खंडणी वसुलीही करतात. अक्षय निर्मले हासुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच होता. तो डिसेंबरमध्ये कारागृहातून बाहेर आला आणि भाजीचे दुकान लावू लागला. त्याने बाजारात आपली पकड बनविण्याचे प्रयत्न चालविले होते. काही दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर निर्मलेने कब्जा करण्याचे प्रयत्न चालविले होते. तर ती जागा हडपण्यासाठी आरोपी वर्मा बंधूदेखील प्रयत्नशील होते. त्यामुळे त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बाचाबाची आणि एकमेकांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अक्षय निर्मले गुन्हेगारी वृत्तीचा असून तो जुमानत नसल्याने बाजारात आपले वर्चस्व कमी होण्याची भीती वाटत असल्याने वर्मा बंधूंनी निर्मलेच्या हत्येचा कट रचला.

ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी वर्मा बंधूंनी निर्मलेच्या भाजीच्या दुकानासमोर आपला चहाचा हातठेला लावला. निर्मलेने हातठेला हटव नाही तर तोडफोड करून फेकून देईन, अशी आरोपींना धमकी दिली. त्यामुळे आरोपी संतप्त झाले. निर्मले काही वेळेनंतर ग्राहकांमध्ये गुंतल्याचे पाहून रात्री ७ ते ७.२० च्या सुमारास चारही भावांनी त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. यावेळी बाजारात मोठी गर्दी होती. शेकडो लोकांसमोर ही थरारक घटना घडली. दहशतीमुळे अनेक दुकानदार आणि ग्राहक पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी निर्मलेला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.

----

हत्येच्या मालिकेमुळे दहशत

गेल्या पाच दिवसात नागपुरात हत्येची मालिका घडल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तीन दिवसांतील हत्येची ही तिसरी घटना आहे. अजनीत सुमित पिंगळे, यशोधरानगर रियाज अन्सारी आणि सदरमध्ये अक्षय निर्मले या तिघांची हत्या झाली. अजनीतील पिंगळे आणि आज आरोपी वर्मा बंधूंनी मारलेला निर्मले हे कुख्यात गुंडच होते. गेल्या वर्षी पिंटू ठवकर हत्याकांडात निर्मले आरोपी होता.