शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

मंगळवारी बाजारात भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आठवडी बाजारात दुकानाच्या जागेच्या वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार भावांनी एका भाजी विक्रेत्यावर शस्त्राचे सपासप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आठवडी बाजारात दुकानाच्या जागेच्या वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार भावांनी एका भाजी विक्रेत्यावर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याची हत्या केली. सदरमधील मंगळवारी बाजारात शेकडो लोकांसमोर ही थरारक घटना घडली. अक्षय किशोर निर्मले (वय २३) असे मृताचे नाव आहे. तर, त्याची हत्या करणाऱ्यांची नावे निखिल वर्मा, रितेश वर्मा राजू वर्मा आणि सुमित वर्मा अशी आहेी. आरोपी दोन सख्खे तर दोन चुलत भाऊ आहेत. ते कळमन्यातील रहिवासी असून मंगळवारी बाजारात ते भाजीचे दुकान तसेच चहाचा ठेला लावतात.

आरोपी वर्मा बंधूंची आठवडी बाजारात प्रचंड दहशत आहे. ते बाजारात जागा देऊन खंडणी वसुलीही करतात. अक्षय निर्मले हासुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच होता. तो डिसेंबरमध्ये कारागृहातून बाहेर आला आणि भाजीचे दुकान लावू लागला. त्याने बाजारात आपली पकड बनविण्याचे प्रयत्न चालविले होते. काही दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर निर्मलेने कब्जा करण्याचे प्रयत्न चालविले होते. तर ती जागा हडपण्यासाठी आरोपी वर्मा बंधूदेखील प्रयत्नशील होते. त्यामुळे त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बाचाबाची आणि एकमेकांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अक्षय निर्मले गुन्हेगारी वृत्तीचा असून तो जुमानत नसल्याने बाजारात आपले वर्चस्व कमी होण्याची भीती वाटत असल्याने वर्मा बंधूंनी निर्मलेच्या हत्येचा कट रचला.

ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी वर्मा बंधूंनी निर्मलेच्या भाजीच्या दुकानासमोर आपला चहाचा हातठेला लावला. निर्मलेने हातठेला हटव नाही तर तोडफोड करून फेकून देईन, अशी आरोपींना धमकी दिली. त्यामुळे आरोपी संतप्त झाले. निर्मले काही वेळेनंतर ग्राहकांमध्ये गुंतल्याचे पाहून रात्री ७ ते ७.२० च्या सुमारास चारही भावांनी त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. यावेळी बाजारात मोठी गर्दी होती. शेकडो लोकांसमोर ही थरारक घटना घडली. दहशतीमुळे अनेक दुकानदार आणि ग्राहक पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी निर्मलेला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.

----

हत्येच्या मालिकेमुळे दहशत

गेल्या पाच दिवसात नागपुरात हत्येची मालिका घडल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तीन दिवसांतील हत्येची ही तिसरी घटना आहे. अजनीत सुमित पिंगळे, यशोधरानगर रियाज अन्सारी आणि सदरमध्ये अक्षय निर्मले या तिघांची हत्या झाली. अजनीतील पिंगळे आणि आज आरोपी वर्मा बंधूंनी मारलेला निर्मले हे कुख्यात गुंडच होते. गेल्या वर्षी पिंटू ठवकर हत्याकांडात निर्मले आरोपी होता.