शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST

रामटेक : रामटेक तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. तालुक्यात दिवसाकाठी ५० अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे येथील ...

रामटेक : रामटेक तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. तालुक्यात दिवसाकाठी ५० अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण आवश्यक आहे. गर्दीचे विकेंद्रीकरण केल्यास संक्रमणाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. रामटेकच्या बाजारात विविध गरजेच्या वस्तूच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी असते. अशा वेळी सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवणे आणि भाजी बाजाराचे पुन्हा विकेंद्रीकरण करणे आवश्यक झाले आहे. कारण मुख्य बाजाराला लागूनच भाजी बाजार असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे हाताबाहेरचे झाले आहे. गतवर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर रामटेक नगरपालिकेच्यावतीने भाजीपाला बाजाराचे सात भागात विकेंद्रीकरण केले होते. त्यामुळे गर्दी विभागल्या गेल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. आठवडी बाजारही बंद होते. आता आठवडी बाजार सुरू झाल्यावर कुणाचेच कुणावर नियंत्रण राहिले नाही, तसेच नियम पाळायचेच नाही, अशी वर्तणूक जनतेकडून होऊ लागल्याने संक्रमणात वाढ झाली. भाजीपाला बाजारात संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली की गर्दी वाढायला लागते. त्यामुळे येथील गर्दीला लगाम लावायचा असेल तर दुकानदारांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा विभागून देणे आवश्यक आहे. यासोबतच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.