शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसीए पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल

By admin | Updated: February 1, 2017 02:15 IST

सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून विना परवाना भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना

पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका : आरोपींमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाचाही समावेश नागपूर : सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून विना परवाना भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना घेणाऱ्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांवर अखेर पोलिसांनी मंगळवारी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये व्हीसीएचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाचाही समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करणे आणि अनेकांचे जीव धोक्यात घातल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. या घडामोडीमुळे क्रीडा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, व्हीसीएने सुरक्षेसंदर्भातील बाबी दुर्लक्षित करून जामठ्यात विना परवानगीने आंतरराष्ट्रीय सामना घेतल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित करून खळबळ उडवून दिली होती. तसेच व्हीसीए पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय! उपसरपंचाने केली तक्रार ४दरम्यान, सामन्याच्या दिवशी डीजेचा कर्णकर्कश आवाज, गोंगाट, मोठ्या संख्येतील वाहनांच्या हॉर्नमुळे जामठा भागातील वृद्ध आणि आजारी नागरिक, विद्यार्थी यांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे व्हीसीए पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सोमवारी जामठा येथील उपसरपंच कवडूजी ढेंगे (वय ४५) यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात दिला. ४या तक्रार अर्जाच्या संबंधाने वरिष्ठ पातळीवर प्रदीर्घ विचारमंथन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी हिंगणा पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपींमध्ये व्हीसीएचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जयस्वाल, उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव भूपेंद्रसिंग भट्टी, सुरक्षेसंबंधीची जबाबदारी सांभाळणारे आनंद देशपांडे आणि संचालक मंडळातील आणखी काही पदाधिकारी यांचा समावेश केला. ४पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ कलम १५ उपकलम (१) मध्ये पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचे उल्लंघन सुरूच राहिल्यास प्रत्येक दिवसामागे पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर रविवारी रात्री टी-२० चा आंतरराष्ट्रीय सामना पार पडला. हा सामना बघण्यासाठी देश-विदेशातील हजारो क्रिकेट रसिक येणार असल्याचा अंदाज असल्याने, सुरक्षेसंबंधाने पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. प्रेक्षक हजारो वाहने आणतील त्यामुळे अपघात होऊ नये, कल्लोळ वाढू नये, कुणाला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खास काळजी घेण्याचीही सूचना पोलिसांनी केली होती. मात्र व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी त्याकडे पुरते दुर्लक्ष केले. व्हीसीएने सुरक्षेचे अनेक मुद्दे वाऱ्यावर सोडतानाच पोलिसांच्या सूचनाही धुडकावल्याने पोलिसांनी या सामन्याची परवानगी रद्द करीत असल्याचे लेखी पत्र व्हीसीए पदाधिकाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे तर रविवारी सकाळी सामना सुरू होण्याच्या काही तासअगोदर पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. मात्र व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे व्हीसीए पदाधिकाऱ्यांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी, यासंबंधाने वरिष्ठ पातळीवर गंभीर स्वरूपाची चर्चा सुरू होती.