शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

दोन निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकली कुलगुरू निवड प्रक्रिया

By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST

चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाणा विद्यापिठाचा कारभार मागील साडेसहा महिन्यांपासून

व्यथा गोंडवाना विद्यापीठाची : साडेसहा महिन्यांपासून कुलगुरू नाहीगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाणा विद्यापिठाचा कारभार मागील साडेसहा महिन्यांपासून कुलगुरूविना सुरु आहे. आधी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत विद्यापिठाचा कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया रखडली आहे. विद्यापीठाला कायम कुलगुरू कधी मिळतो याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. २ आॅक्टोंबर २०११ ला विद्यापीठाच्या निर्मितीची अधिसूचना जारी करण्यात येऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात करण्यात आली. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून राज्यपालांनी शासन निर्णयानुसार डॉ. विजय आर्इंचवार यांची निवड केली. विजय आर्इंचवार हे ७ मार्च २०१४ ला वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झालेत. त्यानंतर नवीन कुलगुरू नियुक्त करणे आवश्यक होते. परंतु विद्यापीठात शासनाने व्यवस्थापन व विद्वत्त समिती स्थापन केली नाही. याशिवाय कोणत्याही अकॅडेमीक समित्यांची स्थापना केली नाही. कुलगुरू निवड प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारी समितीच अस्तित्वात नसल्याने ही प्रक्रिया सुरूच झाली नाही. दरम्यान मार्च महिन्यात १६ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने विभागीय आयुक्तांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांची प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. ते अद्याप काम पाहत आहे. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे आणखी एक ते दीड महिने विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळणे कठीण आहे. सध्या कुलसचिवच सर्व कारभार पाहत आहेत. कुलगुरूविना काम सुरुअसल्याने दोन्ही जिल्ह्यातील २२७ महाविद्यालयांचे अनेक शैक्षणिक प्रश्न खोळंबले आहेत. या संदर्भात मध्यंतरी प्राचार्य फोरमनेही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)