शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

तिजोरी रिकामी, पण बजेट जम्बो

By admin | Updated: July 1, 2014 01:51 IST

महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी

आज मनपाचा अर्थसंकल्प : निवडणूक घोषणांचा पाऊसनागपूर : महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १५५० कोटींचे बजेट सादर करण्याची तयारी चालविली आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला फक्त ८०१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एलबीटीमुळे आर्थिक कंबर मोडली आहे. उत्पन्नवाढीचे दुसरे कोणते मोठे स्रोत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्या जातील. अशाच या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडे पैसा कुठून येईल, असा प्रश्न आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे बोरकर यांना जनतेवर कुठलाही बोझा टाकता येणार नाही. त्यामुळे करात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षांचे बजेट भाषणही जम्बो असेल. सुमारे ४० पानांचे भाषण असू शकते. (प्रतिनिधी)उत्पन्न असे वाढू शकते-मालमत्ता कर वसुलीपासून २५० कोटी येऊ शकतात. यासाठी कर वसुली व मूल्यांकन पद्धत बदलावी लागेल. - बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळांचा व्यावसायिक उपयोग केला तर उत्पन्न वाढू शकते. -मंगळवारी शॉपिंग मॉल वगळता महापालिकतर्फे शहरात दुसरा शॉपिंग मॉल उभारण्यात आला नाही. पाच शॉपिंग मॉल प्रस्तावित आहेत. दानागंज व जरीपटकाचे काम रखडले आहे. हे देखील उत्पन्नाचे चांगले साधन आहे. -शहरातील ६ दैनिक बाजार, २३ अनधिकृत साप्ताहिक तसेच २० दैनिक बाजार अनधिकृत आहेत. नवे बाजार विकसित केले तर बाजार शुल्कापासून महापालिकेला उत्पन्न होईल. -आरेंजसिटी स्ट्रीट हा ४५० कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प साकार झाला तर महापालिकेला चांगले उत्पन्न होईल. अर्थसंकल्पात काय असणार ? -बाल्या बोरकर हे पूर्व नागपुरातील आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात पूर्व नागपूर डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा होऊ शकतात. सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, हॉस्पिटलची घोषणा होऊ शकते. - पारडी उड्डाणपुलाचे काम यावर्षी सुरू होणार आहे. त्यासाठी तरतूद केली जाऊ शकते. -नागनदी, पिवळी नदी सफाई, उद्यानांचा विकास यासाठी घोषणा होईल. अंबाझरी येथे मोठा ध्वज उभारला जाईल. एस्सल वर्ल्डच्या धर्तीवर वॉटर पार्क तयरा करण्याची योजना आहे. -गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा होतील. महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून एखादी नवी योजना मांडली जाऊ शकते. -बीओटी व पीपीपी तत्त्वावर काही योजना मांडल्या जाण्याची शक्यता आहे.