शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा पाणलोटचे ‘भिजत घोंगडे’

By admin | Updated: February 23, 2017 02:16 IST

राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वसुंधरा पाणलोट अभियानांतर्गत भिवापूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

निधीची चणचण : भिवापूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश मालेवाडा : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वसुंधरा पाणलोट अभियानांतर्गत भिवापूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने तीन वर्षांपासून या अभियानाचे तालुक्यात ‘भिजत घोंगडे’ आहे. परिणामी, या अभिनांतर्गत करण्यात येणारी विविध कामे कधी करणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या अभियानांतर्गत २०१४-१५ मध्ये प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होता. यात भिवापूर तालुक्यातील चारगाव, गोटाडी, मांगरूड, बोटेझरी, पाहमी, चिचाळा, गरडापार, मालेवाडा, उखळी, सुकळी, सालेभट्टी, चोरविहिरा व टाका या १२ गावांसह कोंडापूर, भोवरी व येडसंबा या तीन रिठी गावांचा समावेश करण्यात आला होता. या अभियानांतर्गत शेतांची बांधबंधिस्ती, शेततळ्यांची निर्मिती व दुरुस्ती, बोड्यांची (लहान तलाव) निर्मिती, शेतकरी बचतगट तयार करणे, त्यांना रोजगारविषयक मार्गदर्शन करणे, निधी उपलब्ध करून देणे, विकास कामे करणे आदी कामे करणे क्रमप्राप्त आहेत. यासाठी समिती स्थापन करावी लागते. समिती नियुक्तीच्या वादामुळे काही गावे या अभियानातून वगळली. काही गावांमध्ये बचतगटांनाप्रशिक्षण देण्यात आले. यातील सक्रिय शेतकरी गटांना स्वयंरोगारासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य अनुदानावर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वास्तवात, तीन वर्षांच्या काळात एकाही शेतकरीगटाला अर्थपुरवठा करण्यात आला नाही. दुसरीकडे, प्रेरक प्रवेश कार्यक्रम पाण्याचे हौद, धुण्याचे ओटे, संरक्षण भिंत आदी कामांना शासनाने मंजुरी दिली. परंतु, निधी न मिळाल्याने ती कामे करावयाची कशी, असा प्रश्न बचतगटाच्या सदस्यांना पडला. (वार्ताहर)