शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

वसंतराव नाईक होते शेतकऱ्यांचे जाणते मुख्यमंत्री

By admin | Updated: August 19, 2014 00:54 IST

‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार

सुधीरकुमार गोयल : कर्तबगार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार पुसद (जि. यवतमाळ) : ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी येथे केले. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील कर्तबगार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांच्या सत्कार सोहळ््यात ते बोलत होते. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी मंत्री अविनाश नाईक, निरंजन नाईक, अ‍ॅड़. निलय नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, अ‍ॅड़ अनंतराव देवसरकर, मारोतराव वंजारे, वसंत कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, पंचायत समिती सभापती आशा पांडे, इंद्रनील नाईक, राज नाईक, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, विजय चव्हाण, आर.डी. राठोड, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सुर्यवंशी उपस्थित होते. डॉ. गोयल पुढे म्हणाले, देश शेतकरी चालवितो. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शेतीला राजकारणात व अर्थकारणात स्थान मिळाले नाही. ही खंत असली तरी शेतकऱ्यांसाठी झटणारा व शेतीला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा शेतकऱ्यांचा द्रष्टानेता कुणी असेल तर ते म्हणजे वसंतराव नाईक होते. मान्सून आणि मार्केटच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. निव्वळ शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वत: नियोजन केले पाहिजे. शेतकरी एकजूट झाला तरच त्याच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल. प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. गोयल यांचा सत्कार दीपक आसेगांवकर यांनी केला. जळगाव जिल्ह्यातील बंभोरी येथील के.बी. पाटील यांना वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उपराळीचे गणेश शिवाजी पाटील, सांगली जिल्ह्यातील पलूसचे संदीप तुकाराम शिरसाट, अहमदनगर जिल्ह्यातील भांडेवाडीचे सुरेंद्र तुळशीराम शिंदे, नांदेड जिल्ह्यातील साप्तीचे कबीरदास विश्वनाथ कदम, औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील दीपक पांडुरंग चव्हाण, यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील अमृतराव दादाराव देशमुख, बुलडाणा जिल्ह्यातील शेळगाव येथील चंद्रकलाबाई प्रकाश सुरोशे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी स्वागतगीत तर प्रा. साधना मोहोड यांनी पसायदान सादर केले. डॉ.गोयल यांच्या हस्ते प्रा. दिनकर गुल्हाने संपादित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)