शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक होते शेतकऱ्यांचे जाणते मुख्यमंत्री

By admin | Updated: August 19, 2014 00:54 IST

‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार

सुधीरकुमार गोयल : कर्तबगार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार पुसद (जि. यवतमाळ) : ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी येथे केले. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील कर्तबगार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांच्या सत्कार सोहळ््यात ते बोलत होते. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी मंत्री अविनाश नाईक, निरंजन नाईक, अ‍ॅड़. निलय नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, अ‍ॅड़ अनंतराव देवसरकर, मारोतराव वंजारे, वसंत कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, पंचायत समिती सभापती आशा पांडे, इंद्रनील नाईक, राज नाईक, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, विजय चव्हाण, आर.डी. राठोड, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सुर्यवंशी उपस्थित होते. डॉ. गोयल पुढे म्हणाले, देश शेतकरी चालवितो. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शेतीला राजकारणात व अर्थकारणात स्थान मिळाले नाही. ही खंत असली तरी शेतकऱ्यांसाठी झटणारा व शेतीला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा शेतकऱ्यांचा द्रष्टानेता कुणी असेल तर ते म्हणजे वसंतराव नाईक होते. मान्सून आणि मार्केटच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. निव्वळ शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वत: नियोजन केले पाहिजे. शेतकरी एकजूट झाला तरच त्याच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल. प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. गोयल यांचा सत्कार दीपक आसेगांवकर यांनी केला. जळगाव जिल्ह्यातील बंभोरी येथील के.बी. पाटील यांना वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उपराळीचे गणेश शिवाजी पाटील, सांगली जिल्ह्यातील पलूसचे संदीप तुकाराम शिरसाट, अहमदनगर जिल्ह्यातील भांडेवाडीचे सुरेंद्र तुळशीराम शिंदे, नांदेड जिल्ह्यातील साप्तीचे कबीरदास विश्वनाथ कदम, औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील दीपक पांडुरंग चव्हाण, यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील अमृतराव दादाराव देशमुख, बुलडाणा जिल्ह्यातील शेळगाव येथील चंद्रकलाबाई प्रकाश सुरोशे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी स्वागतगीत तर प्रा. साधना मोहोड यांनी पसायदान सादर केले. डॉ.गोयल यांच्या हस्ते प्रा. दिनकर गुल्हाने संपादित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)