शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वरवरा राव यांच्या जामीनला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड घातपात प्रकरणामध्ये आरोपी असलेले ज्येष्ठ कवी व विचारवंत ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड घातपात प्रकरणामध्ये आरोपी असलेले ज्येष्ठ कवी व विचारवंत डॉ. पी.व्ही. वरवरा राव (८१) यांचा अंतरिम जामीन येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवून दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

न्यायालयाने गेल्या २३ फेब्रुवारी रोजी राव यांना चार आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून राव यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, चार आठवडे पूर्ण झाल्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत वाढवून घेण्यासाठी हे प्रकरण न्यायालयासमक्ष ठेवण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सरकारला उत्तराविषयी विचारले असता सरकारने याकरिता वेळ देण्याची विनंती केली. परिणामी, न्यायालयाने प्रकरणावर येत्या ३१ मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित केली व राव यांना तेव्हापर्यंत अंतरिम जामीन वाढवून दिला.

२३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सूरजागड लोह खदान परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली होती. तसेच, वाहन चालक, त्यांचे सहायक व मजुरांना काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांना अंगावर डिझेल टाकून जाळून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. अश्लील शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणात ट्रक चालक राजबिंदरसिंग शेरगील यांच्या तक्रारीवरून एटापल्ली पोलिसांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४१, ३४२, ४३५, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९, १२०-ब यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात राव यांचा या घटनेशी संबंध आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. ८ जून २०२० रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने राव यांना या गुन्ह्यात जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. रावतर्फे ॲड. बरुण कुमार तर, सरकारतर्फे ॲड. एस.एम. उके यांनी कामकाज पाहिले.