शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वंदे मातरम् वरून राजकारण व्हायला नको - संबीत पात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 22:10 IST

 देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदे मातरम् आवाज देशात टिकला पाहिजे. वंदे मातरम् वरून राजकारण व्हायला नको. असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी केले. मातृभूमी प्रतिष्ठान नागपूरतर्फे सक्रदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिन सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. 

नागपूर, दि. 14 -  देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदे मातरम् आवाज देशात टिकला पाहिजे. वंदे मातरम् वरून राजकारण व्हायला नको. असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी केले. मातृभूमी प्रतिष्ठान नागपूरतर्फे सक्रदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिन सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर  कोहळे,नागो गाणार, डॉ. उपेंद्र कोठेकर, आयोजक डॉ. रविंद्र भोयर, सत्कारमूर्ती निवृत्त बिग्रेडियर रुपचंद जैस आदी उपस्थित होते. 2014 च्या निवडणुकीनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देशाला स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा देश बनवायचा आहे. त्यांनी 2022 सालापर्यत भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प केला आहे. आईच्या चरणात नतमस्तक होण्यासाठी वंदे मातरम् म्हणण्यात गैर काय अशी भूमिका  संबीत पात्रा यांनी मांडली. देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद बिघडला आहे. अतिराष्ट्रवाद होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काही लोकांकडून केला जात आहे. परंतु  देशाला शांती देणारी संस्कृती राष्ट्रवाद कसा बिघडवणार असा सवाल त्यांनी केला.