शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2023 07:00 IST

Nagpur News मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळीपावणेतीन कोटींपेक्षा जास्त कमाई

नरेश डोंगरे 

नागपूर : मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे. एवढेच नव्हे तर रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत अशी पावणेतीन कोटी रुपयांची गंगाजळीही ओतली आहे.

नागपूर ते बिलासपूर या मार्गावर ११ डिसेंबर २०२२ ला ही आलिशान रेल्वेगाडी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवली होती. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनमध्ये इतक्या सोयी-सुविधा अन् वैशिष्ट्ये आहेत की, तिच्यात प्रवास करणाऱ्यांना ती धक्का न लागू देता त्यांच्या इच्छित स्थानकावर सोडते. यापूर्वी नागपूर ते बिलासपूर हा रेल्वेमार्गाचा प्रवास १० ते ११ तासांचा होता. तो वंदे भारतमुळे केवळ साडेपाच तासांचा झाला आहे. या रेल्वेत अन्य सोयीसुविधांसह गरमागरम जेवण, शीतपेय, ऑन डिमांड वायफाय उपलब्ध आहे. त्यामुळे मध्य आणि उच्चवर्गीय प्रवासी, तसेच व्यापारी बांधव या गाडीला पसंती दर्शवीत आहेत.

मध्य भारतातील महत्त्वाचे प्रमुख शहर मानल्या जाणाऱ्या नागपुरात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील व्यापारी बांधवांची मोठ्या प्रमाणात रोजच ये-जा असते. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, ही गाडी बिलासपूरहून सकाळी ६:४५ वाजता सुटते आणि नागपुरात दुपारी १२:१५ वाजता पोहोचते.

त्याचप्रमाणे नागपूरहून ती रोज दुपारी २:०५ वाजता सुटते आणि रात्री ७:३५ वाजता बिलासपूरला पोहोचते. मार्गातील रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकांवर हिचे थांबे आहेत. अर्थात सकाळी व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने निघालेले व्यापारी रात्री आपल्या घरी पोहोचतात. त्यामुळे या रेल्वेगाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

११ डिसेंबरला ही रेल्वेगाडी सुरू झाली तरी ती विशेष निमंत्रितांनाच येथून बिलासपूरला घेऊन गेली होती. त्यामुळे तिची व्यावसायिक प्रवासी सेवा खऱ्या अर्थाने १२ डिसेंबर २०२२ ला सुरू झाली. तेव्हापासून तो १३ जानेवारी २०२३ या महिनाभरात वंदे भारतमध्ये १७ हजार ८२२ प्रवाशांनी नागपूर ते बिलासपूर प्रवास करून १ कोटी ४५ लाख ९४ हजार ६७८ रुपयांचा महसूल दिला. याच महिनाभराच्या कालावधीत वंदे भारतमध्ये १८ हजार ५२९ प्रवाशांनी बिलासपूर ते नागपूर प्रवास करून वंदे भारतला १ कोटी ३९ लाख १३ हजार ४६७ रुपये दिले.

सुरक्षेवर विशेष भर !

वंदे भारतमध्ये सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रवाशांना आकस्मिक अडचण आल्यास ते आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेनच्या चालकाशी आणि अन्य कर्मचाऱ्यांशी बोलू शकतात. सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही असून प्लॅटफॉर्म साइड कॅमेरेदेखील आहेत. डब्याच्या बाहेर रिअरव्ह्यू कॅमेऱ्यांचा समावेश आहे. सर्व डबे पूर्णपणे सीलबंद गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न आहेत.

----

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस