शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

‘वंदे मातरम्’ला विरोध खेदजनकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:53 IST

स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मातरम्’ने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली होती. राष्ट्रचेतनेचे व शक्तीचे प्रतीक असलेले हे गीत आहे.

ठळक मुद्देसुधाकर गायधनी : ‘अंदमान की व्यथा, निकोबार की कथा’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मातरम्’ने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली होती. राष्ट्रचेतनेचे व शक्तीचे प्रतीक असलेले हे गीत आहे. मात्र आता धर्माच्या नावावर ‘वंदे मातरम्’ला होणारा विरोध हा अतिशय खेदजनक प्रकार आहे. ज्याला ‘वंदे मातरम्’ कळते त्याला देश कळतो, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. वामन गाणार लिखित ‘अंदमान की व्यथा, निकोबार की कथा’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.नाथे पब्लिकेशनतर्फे पत्रकार भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब झिटे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही, माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, संजय नाथे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’ या गीताने देशभरात स्फुल्लिंग जागविले होते. त्याला धर्म, पंथाच्या मर्यादा नव्हत्या. क्रांतिकारक अशफाक उल्ला खान यांनी तर फाशीवर जाताना ‘वंदे मातरम्’चाच नारा दिला होता. असे असताना धर्माच्या नावावर आता याच गीताला विरोध होत आहे ही दुर्दैवी बाब आहे, असे सुधाकर गायधनी म्हणाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत अगणित लोकांनी हौतात्म्य पत्करले. मात्र अद्यापही स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळेच स्वातंत्र्याची किंमत लोकांना कळत नाही, असे मत नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केले. माजी न्यायमूर्ती किशोर रोही यांनी अंदमान-निकोबारचा इतिहास, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग आणि तेथील आताच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. अंदमान-निकोबारचा इतिहास सर्वार्थाने नागरिकांसमोर येण्याची आवश्यकता आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने हे कसब साधले आहे, असे प्रतिपादन भाऊसाहेब झिटे यांनी केले. शिवाजी बोडखे, संजय नाथे यांनीदेखील यावेळी आपले मत व्यक्त केले. तसेच लेखक वामन गाणार यांनी पुस्तक लेखनाच्या प्रवासावर भाष्य केले.ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य हेदेखील या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते सभागृहात येऊ शकले नाही. मात्र त्यांनी प्रकाशन समारंभाअगोदर उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या.