नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही उत्तीर्णांच्या उपराजधानीत विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. परंतु ‘टॉपर्स’ विद्यार्थ्यांमध्ये मात्र मुलांनी बाजी मारली आहे. विदर्भातून ‘टॉप’ आलेल्या चैतन्य येवलेपाठोपाठ केशवनगर माध्यमिक शाळेचा सुमंत वऱ्होकर व सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील राजवी आंबुलकर यांनी प्रत्येकी ९८.६ टक्के (४९३) गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकाविला.(प्रतिनिधी)४तर सोमलवार हायस्कूल, निकालसचा विद्यार्थी हर्षद इंगोले व पंडित बच्छराज विद्यालयाचा विद्यार्थी अभिनव शिखरे यांनी ९८.४० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. निकालानंतर गुणवंतांवर कौतुकाचा वर्षाव होत होता.४नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३२,७९४ पैकी २८,८८१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.०७ टक्के इतके आहे. तर जिल्ह्यातून ८३.८८ टक्के मुले उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८५.९७ टक्के इतका राहिला.४नागपूर शहरात १९,०२० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १६,७३६ म्हणजेच ८७.९९ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या, तर १८,९६२ पैकी १५,९१६ (८३.९४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वेलडन गर्ल्स !
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST