शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांनी बांधली वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

नागपूर : देशातील नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे हा कायदा ...

नागपूर : देशातील नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे हा कायदा रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील, असा संकल्प करीत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी केंद्र सरकार विरोधात वज्रमूठ बांधली. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात भिवापूर ते नरखेड तालुक्यापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला बळ देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. कामठी तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश महासचिव सुरेश भोयर यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार विरोधात निदेर्शने करण्यात आली. जिल्ह्यात उमरेड, बुटीबोरी, भिवापूर, रामटेक, नरखेड, कुही, मांढळ, वाडी, कोराडी या सर्वच प्रमुख शहरात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचे समर्थक रस्त्यावर उतरले. सावनेर शहरात मुख्य रस्त्यावर टायर जाळत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. बंदमुळे जिल्ह्यातील कामठी, सावनेर, नरखेड आदी बाजार समित्यांचे व्यवहार दुुपारपर्यंत ठप्प राहिले.