शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

लस संपली, लसीकरण करायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST

भिवापूर : कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर ही महत्त्वाची आयुधे आहेत. अशात संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची ...

भिवापूर : कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर ही महत्त्वाची आयुधे आहेत. अशात संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणारी प्रतिबंधित लस प्रत्येकाने घ्यावीच, असा आग्रह शासन व प्रशासन करीत आहे. मात्र, भिवापूर तालुक्यात हा आग्रह निव्वळ तोंडसुख देणारा ठरला आहे. कारण लस संपलेली आहे. पुरवठा थांबलेला आहे. त्यामुळे लसीकरण करायचे कसे, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. तालुक्यात २० हजार लोकांचे लसीकरण करण्याचे प्राथमिक टार्गेट तालुका व्यवस्थापनाने ठेवले आहे. आजच्या स्थितीत १४,५०० च्या जवळपास लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यात ६० वर्षांवरील, ४५ वर्षांवरील महिला व पुरुष, फ्रंट लाईन वर्करचा समावेश आहे. प्रारंभी लसीकरणासाठी शासन व प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले गेले. मात्र, सामान्य नागरिकांत काहीअंशी गैरसमज पसरल्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. आता मात्र संसर्गाचा प्रकोप वाढत चालला आहे. दररोज मृत्यूचे आकडे हृदय हेलावून टाकणारे आहेत. त्यामुळे बचावाकरिता प्रतिबंधात्मक लस महत्त्वाची ठरत आहे. हे कळून चुकल्याने गत आठवडाभरापासून तालुक्यात लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, आता लस संपल्याने लसीकरण करायचे कसे, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.

मागणीपेक्षा पुरवठा कमी

तालुक्यात दररोज २ हजार लसीची मागणी आहे. मात्र, त्या तुलनेत फारच कमी पुरवठा होत आहे. कधी हजार तर कधी पाचशे लसीचे डोस मिळत आहेत. मंगळवारी लसीचे १ हजार डोस मिळाले होते. ते संपल्यानंतर आता मात्र ठणठणाट आहे. त्यामुळे उद्या लसीकरण केंद्र बंद झाल्यास नवल वाटू नये.

लोकप्रतिनिधी गप्प

तालुक्यात लसीचा मोठा तुटवडा आहे. मागणीएवढा पुरवठा व्हावा. यासाठी तालुकास्तरावरील अधिकारी धडपडत आहेत. पुरवठा वाढविण्यासाठी वरिष्ठांना साकडे घालत आहे. मात्र, तालुकास्तरावरील यंत्रणेच्या या प्रयत्नांना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ‘बुस्टर डोज’ मिळताना दिसत नाही. काही लोकप्रतिनिधी क्वारंटाईन, तर काही लोकप्रतिनिधी निव्वळ फोटोसेशनमध्ये गुंग आहेत. आ. राजू पारवे यांनी लसीच्या तुटवड्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असा सूर व्यक्त होत आहे.

शहरात केंद्र कसे वाढविणार?

लसीची मागणी वाढल्याने तालुका व्यवस्थापनाने तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण सुरू केले आहे. आता भिवापूर शहरात लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद व मागणी लक्षात घेता, तालुका प्रशासनाने शहरात चार ते पाच लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, गत दोन- तीन दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्यामुळे प्रशासनही हतबल आहे. शहरात लसीकरण केंद्राची संख्या वाढविली तरी लस कुठून आणायची हा प्रश्नच आहे.