शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

परीक्षेच्या तोंडावर युवारंग!

By admin | Updated: March 11, 2015 02:07 IST

‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना

नागपूर : ‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या महोत्सवाचा त्यांनाच मोकळेपणाने आनंद घेता येत नसून केवळ यंदा यात निरुत्साहच दिसून येत आहे. विद्यार्थी संघटनांच्या राजकारणामुळे ‘युवारंग’चे आकर्षण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठराविक महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाल्याचे चित्र आहे.विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेच्यावतीने दरवर्षी ‘युवा महोत्सव’ हा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या सर्वच महाविद्यालयांना यात सहभाग घेता येतो. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व असते. सध्या अनेक महाविद्यालयांत विद्यापीठाच्या उन्हाळी प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे, शिवाय विद्यार्थी लेखी परीक्षांच्या तयारीलादेखील लागले आहे. अशास्थितीत ९ मार्चपासून ‘युवारंग’ला सुरुवात झाली. डोळ्यासमोर परीक्षेचे दडपण असताना अनेक विद्यार्थ्यांनी ‘युवारंग’कडे पाठ फिरवली आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांना तर याची सूचनाच वेळेवर देण्यात आली. त्यामुळे केवळ करायचे म्हणून केलेले आयोजन असल्याची टीका विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कारणीभूत कोण?यंदा विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका उशिरा झाल्या. त्यातच अध्यक्ष व सचिवांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा साधारणत: निवडणुकांनंतर चार महिन्यांनी पदग्रहण समारंभ घेण्यात आला. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा विजय झाला होता. परंतु पदग्रहण समारंभाबाबत आपापल्या पक्षातील नेत्यांच्या तारखा घेण्यातच वेळ गेला अन् त्याचा फटका विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या आयोजनाला बसला. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना हक्काचा ‘प्लॅटफॉर्म’ वेळेत उपलब्ध करून द्यायला हवा होता. विद्यार्थी संघटनांनी याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.कारणीभूत कोण?यंदा विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका उशिरा झाल्या. त्यातच अध्यक्ष व सचिवांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा साधारणत: निवडणुकांनंतर चार महिन्यांनी पदग्रहण समारंभ घेण्यात आला. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा विजय झाला होता. परंतु पदग्रहण समारंभाबाबत आपापल्या पक्षातील नेत्यांच्या तारखा घेण्यातच वेळ गेला अन् त्याचा फटका विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या आयोजनाला बसला. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना हक्काचा ‘प्लॅटफॉर्म’ वेळेत उपलब्ध करून द्यायला हवा होता. विद्यार्थी संघटनांनी याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.