शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

परीक्षेच्या तोंडावर युवारंग!

By admin | Updated: March 11, 2015 02:07 IST

‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना

नागपूर : ‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या महोत्सवाचा त्यांनाच मोकळेपणाने आनंद घेता येत नसून केवळ यंदा यात निरुत्साहच दिसून येत आहे. विद्यार्थी संघटनांच्या राजकारणामुळे ‘युवारंग’चे आकर्षण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठराविक महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाल्याचे चित्र आहे.विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेच्यावतीने दरवर्षी ‘युवा महोत्सव’ हा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या सर्वच महाविद्यालयांना यात सहभाग घेता येतो. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व असते. सध्या अनेक महाविद्यालयांत विद्यापीठाच्या उन्हाळी प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे, शिवाय विद्यार्थी लेखी परीक्षांच्या तयारीलादेखील लागले आहे. अशास्थितीत ९ मार्चपासून ‘युवारंग’ला सुरुवात झाली. डोळ्यासमोर परीक्षेचे दडपण असताना अनेक विद्यार्थ्यांनी ‘युवारंग’कडे पाठ फिरवली आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांना तर याची सूचनाच वेळेवर देण्यात आली. त्यामुळे केवळ करायचे म्हणून केलेले आयोजन असल्याची टीका विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कारणीभूत कोण?यंदा विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका उशिरा झाल्या. त्यातच अध्यक्ष व सचिवांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा साधारणत: निवडणुकांनंतर चार महिन्यांनी पदग्रहण समारंभ घेण्यात आला. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा विजय झाला होता. परंतु पदग्रहण समारंभाबाबत आपापल्या पक्षातील नेत्यांच्या तारखा घेण्यातच वेळ गेला अन् त्याचा फटका विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या आयोजनाला बसला. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना हक्काचा ‘प्लॅटफॉर्म’ वेळेत उपलब्ध करून द्यायला हवा होता. विद्यार्थी संघटनांनी याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.कारणीभूत कोण?यंदा विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका उशिरा झाल्या. त्यातच अध्यक्ष व सचिवांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा साधारणत: निवडणुकांनंतर चार महिन्यांनी पदग्रहण समारंभ घेण्यात आला. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा विजय झाला होता. परंतु पदग्रहण समारंभाबाबत आपापल्या पक्षातील नेत्यांच्या तारखा घेण्यातच वेळ गेला अन् त्याचा फटका विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या आयोजनाला बसला. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना हक्काचा ‘प्लॅटफॉर्म’ वेळेत उपलब्ध करून द्यायला हवा होता. विद्यार्थी संघटनांनी याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.