शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

चौकशी अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर

By admin | Updated: May 12, 2017 02:58 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करणे कठीण आव्हान झाले आहे.

एनडीसीसी बँक घोटाळा : मानसिक स्थिरतेवर केला जातो आघात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करणे कठीण आव्हान झाले आहे. चौकशी अधिकाऱ्यावर सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे दबावतंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्याच्या मानसिक स्थिरतेवर आघात होतो. पूर्वीचे चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे या कटू अनुभवातून गेले आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार आणि बँकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी हे याप्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. केदार यांच्यामुळे याप्रकरणाला राजकीय कोन आहे. दबावतंत्राचा वापर उघडपणे केला जात नसल्यामुळे चौकशी अधिकाऱ्याला कोण त्रास देतो याचा शोध घेणे स्वतंत्र तपासाचा विषय झाला आहे. सहकारी संस्थांच्या घोटाळेबाज पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० अंतर्गत चौकशी केली जाते. सुरुवातीस या चौकशीला जास्त गांभीर्याने घेण्यात आले नव्हते. परंतु, प्रथम चौकशी अधिकारी यशवंत बागडे यांनी केदार यांच्यासह आठ जणांना घोटाळ्यासाठी जबाबदार धरले होते. तसेच, केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाख ३३ हजार, तर चौधरी यांच्यावर २५ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. त्यामुळे सर्व आरोपींचे धाबे दणाणले. आरोपींच्या अपीलानंतर तत्कालीन सहकार मंत्र्यांनी तांत्रिक कारणाने अहवाल नामंजूर केल्यामुळे आरोपी बचावले. परंतु, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. प्रकरणाची फेरचौकशी केली जात आहे. बागडे यांच्या अहवालानंतर अनेकांना फेरचौकशी पूर्ण होऊ नये असे वाटत आहे. त्यामुळेच दुसरे चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला होता. त्यांना दूरध्वनी करून धमक्या देण्यात येत होत्या. पैशांचा मोह दाखविला जात होता. एवढेच नाही तर, शासनही त्यांना योग्य सहकार्य करीत नव्हते. चौकशी करण्यासाठी आवश्यक सुविधा त्यांना दिल्या जात नव्हत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष स्वत:ची व्यथा मांडली होती. यावरून चौकशी प्रभावित करण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट होते. खरबडे यांनी चौकशी सोडल्यानंतर शासनाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे प्रकरणाची कागदपत्रे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता पुढील घडामोडींवर सर्वांची नजर आहे.