शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

चौकशी अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर

By admin | Updated: May 12, 2017 02:58 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करणे कठीण आव्हान झाले आहे.

एनडीसीसी बँक घोटाळा : मानसिक स्थिरतेवर केला जातो आघात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करणे कठीण आव्हान झाले आहे. चौकशी अधिकाऱ्यावर सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे दबावतंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्याच्या मानसिक स्थिरतेवर आघात होतो. पूर्वीचे चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे या कटू अनुभवातून गेले आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार आणि बँकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी हे याप्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. केदार यांच्यामुळे याप्रकरणाला राजकीय कोन आहे. दबावतंत्राचा वापर उघडपणे केला जात नसल्यामुळे चौकशी अधिकाऱ्याला कोण त्रास देतो याचा शोध घेणे स्वतंत्र तपासाचा विषय झाला आहे. सहकारी संस्थांच्या घोटाळेबाज पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० अंतर्गत चौकशी केली जाते. सुरुवातीस या चौकशीला जास्त गांभीर्याने घेण्यात आले नव्हते. परंतु, प्रथम चौकशी अधिकारी यशवंत बागडे यांनी केदार यांच्यासह आठ जणांना घोटाळ्यासाठी जबाबदार धरले होते. तसेच, केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाख ३३ हजार, तर चौधरी यांच्यावर २५ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. त्यामुळे सर्व आरोपींचे धाबे दणाणले. आरोपींच्या अपीलानंतर तत्कालीन सहकार मंत्र्यांनी तांत्रिक कारणाने अहवाल नामंजूर केल्यामुळे आरोपी बचावले. परंतु, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. प्रकरणाची फेरचौकशी केली जात आहे. बागडे यांच्या अहवालानंतर अनेकांना फेरचौकशी पूर्ण होऊ नये असे वाटत आहे. त्यामुळेच दुसरे चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला होता. त्यांना दूरध्वनी करून धमक्या देण्यात येत होत्या. पैशांचा मोह दाखविला जात होता. एवढेच नाही तर, शासनही त्यांना योग्य सहकार्य करीत नव्हते. चौकशी करण्यासाठी आवश्यक सुविधा त्यांना दिल्या जात नव्हत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष स्वत:ची व्यथा मांडली होती. यावरून चौकशी प्रभावित करण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट होते. खरबडे यांनी चौकशी सोडल्यानंतर शासनाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे प्रकरणाची कागदपत्रे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता पुढील घडामोडींवर सर्वांची नजर आहे.