शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘घायाळ पाखरा’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग

By admin | Updated: October 27, 2014 00:29 IST

बहुजन रंगभूमीतर्फे निर्मित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा ऐतिहासिक शंभरावा प्रयोग नुकताच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी

बहुजन रंगभूमीचे सादरीकरण : रंगकर्मींचा सत्कार नागपूर : बहुजन रंगभूमीतर्फे निर्मित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा ऐतिहासिक शंभरावा प्रयोग नुकताच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी प्रामुख्याने उपस्थित होते. वैदर्भीय रंगभूमीवर एखाद्या नाटकाचा शंभरावा प्रयोग होण्याचा इतिहासही यानिमित्ताने रचला गेला. वीरेंद्र गणवीर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक सातत्याने रंगभूमीवर सादर करण्यात आले. याप्रसंगी शंभर प्रयोगांचा टप्पा गाठल्याबद्दल नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हा प्रयोग स्त्रीच्या विविध भावनांचे प्रकटीकरण करणारा आहे. शेवंता ही स्त्री, प्रेयसी, पत्नी, माता म्हणून येणाऱ्या व्यथांचे प्रकटीकरण करणारी आहे. शेवंतावर गावातील सरपंचाची नजर असते. तिच्या संसारात विघ्न आणून वेगवेगळ्या प्रकारांनी तिचा नवरा मनोहर याला सरपंच हैराण करतो. दलित समाजातील भीमा विकलांग असतो आणि त्याची आई भीमा या संघर्षात भरडले जातात. विरोधातून प्रेमविवाह केलेल्या शेवंता आणि मनोहर यांची स्वाभाविक आपल्या अपत्याविषयी अनेक स्वप्न असतात पण मनोहरच्या नजरचुकीने अवघ्या सहा महिन्यांचा असताना भीमा पाळण्यातून खाली पडतो आणि विकलांग होतो. सरपंच मनोहरच्या संपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी त्याचा छळ करीत असतोच पण हा वाद विकोपाला जाऊन सरपंच मनोहरची हत्या करतो. त्यानंतर मात्र भीमा या घायाळ पाखराची वेदना सुरू होते. शेवंता मात्र भीमाला मोठे करण्याचे आणि त्याला खूप शिकविण्याचे स्वप्न पाहते. हा संघर्ष, भीमाला होणारी मारहाण, शाळेतील विद्यार्थ्यांकडून होणारा मानभंग आणि शेवंताची त्याला शिकविण्याची धडपड या प्रयोगात आहे. अखेर भीमाही या संघर्षाला तोंड देत मोठे होण्याची जिद्द बाळगतो आणि नाटक संपताना एक आशावाद पेरते. अतुल सोमकुंवर आणि प्रियंका तागडे यांनी या प्रयोगात अभिनयात जीव ओतला. या प्रयोगाला प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, नासुप्रचे सभापती हर्षदीप कांबळे, डॉ. नीलकांत कुलसंगे, नाटककार अमर रामटेके उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते सर्व नाट्यकलावंतांचा सत्कार करण्यात आला. ही चळवळ डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राबवित असल्याचे मत यावेळी वीरेंद्र गणवीर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)