शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

‘घायाळ पाखरा’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग

By admin | Updated: October 27, 2014 00:29 IST

बहुजन रंगभूमीतर्फे निर्मित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा ऐतिहासिक शंभरावा प्रयोग नुकताच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी

बहुजन रंगभूमीचे सादरीकरण : रंगकर्मींचा सत्कार नागपूर : बहुजन रंगभूमीतर्फे निर्मित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा ऐतिहासिक शंभरावा प्रयोग नुकताच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी प्रामुख्याने उपस्थित होते. वैदर्भीय रंगभूमीवर एखाद्या नाटकाचा शंभरावा प्रयोग होण्याचा इतिहासही यानिमित्ताने रचला गेला. वीरेंद्र गणवीर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक सातत्याने रंगभूमीवर सादर करण्यात आले. याप्रसंगी शंभर प्रयोगांचा टप्पा गाठल्याबद्दल नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हा प्रयोग स्त्रीच्या विविध भावनांचे प्रकटीकरण करणारा आहे. शेवंता ही स्त्री, प्रेयसी, पत्नी, माता म्हणून येणाऱ्या व्यथांचे प्रकटीकरण करणारी आहे. शेवंतावर गावातील सरपंचाची नजर असते. तिच्या संसारात विघ्न आणून वेगवेगळ्या प्रकारांनी तिचा नवरा मनोहर याला सरपंच हैराण करतो. दलित समाजातील भीमा विकलांग असतो आणि त्याची आई भीमा या संघर्षात भरडले जातात. विरोधातून प्रेमविवाह केलेल्या शेवंता आणि मनोहर यांची स्वाभाविक आपल्या अपत्याविषयी अनेक स्वप्न असतात पण मनोहरच्या नजरचुकीने अवघ्या सहा महिन्यांचा असताना भीमा पाळण्यातून खाली पडतो आणि विकलांग होतो. सरपंच मनोहरच्या संपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी त्याचा छळ करीत असतोच पण हा वाद विकोपाला जाऊन सरपंच मनोहरची हत्या करतो. त्यानंतर मात्र भीमा या घायाळ पाखराची वेदना सुरू होते. शेवंता मात्र भीमाला मोठे करण्याचे आणि त्याला खूप शिकविण्याचे स्वप्न पाहते. हा संघर्ष, भीमाला होणारी मारहाण, शाळेतील विद्यार्थ्यांकडून होणारा मानभंग आणि शेवंताची त्याला शिकविण्याची धडपड या प्रयोगात आहे. अखेर भीमाही या संघर्षाला तोंड देत मोठे होण्याची जिद्द बाळगतो आणि नाटक संपताना एक आशावाद पेरते. अतुल सोमकुंवर आणि प्रियंका तागडे यांनी या प्रयोगात अभिनयात जीव ओतला. या प्रयोगाला प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, नासुप्रचे सभापती हर्षदीप कांबळे, डॉ. नीलकांत कुलसंगे, नाटककार अमर रामटेके उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते सर्व नाट्यकलावंतांचा सत्कार करण्यात आला. ही चळवळ डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राबवित असल्याचे मत यावेळी वीरेंद्र गणवीर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)