शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठविण्याची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST

नागपूर : ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता सरकारने ५ ते ८ वर्गाच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू ...

नागपूर : ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता सरकारने ५ ते ८ वर्गाच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर ग्रामीण ९ ते १२ वर्ग सुरू होऊन महिना लोटला असतानाही केवळ ३४ टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. काही तुरळक कारणे असली तरी ९ ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. आता सरकार ५ ते ८ वर्ग नियमित सुरू करणार आहे. या वर्गातील मुलांचा वयोगट कमी असल्याने काही प्रमाणात पालकांमध्ये धास्ती आहे. पण ग्रामीण भागातील काही पालकांनी ९ ते १२ चे वर्ग सुरळीत झाल्याचे बघून शाळेत पाठविण्याला दुजोरा दिला आहे.

राज्य शासनाने ५ ते ८ वर्ग सुरू करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशामुळे पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाचेही पुन्हा टेन्शन वाढले आहे. तशा ९ ते १२ च्या ग्रामीण भागात ६४६ शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांमध्ये ५ ते ८ वर्ग आहे. फक्त जिल्हा परिषदेच्या ५६८ शाळांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोरोनाच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नव्हत्या.

- जिल्ह्यातील एकूण शाळा - १२१४

- शिक्षकांची संख्या - १७३२

- विद्यार्थ्यांची संख्या - ११२०० (वर्गनिहाय आकडेवारी गोळा करणे सुरू आहे)

- ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची ३४ टक्के उपस्थिती

नागपूर ग्रामीणमध्ये ९ ते १२ च्या ६४६ शाळा आहेत. यात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३१ हजारावर आहे. ग्रामीणमध्ये शाळा सुरू होऊन महिना लोटला आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या शाळा भेटी अहवालानुसार ४५ हजारावर विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत.

- पालकांना काय वाटते

- कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही. शाळा सुरू व्हाव्यात अशी पालकांना अपेक्षा आहेच, विद्यार्थीही आता घरी बसून कंटाळले आहे. मुले लहान असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये याची भीती आहे.

नरेश कहिले, पालक

- तसे तर वर्ष संपलेलेच आहे. दोन महिन्यांसाठी शाळा सुरू करून काही विपरीत घडल्यास जबाबदारी कोण घेणार आहे. मला वाटते की यावर्षी विद्यार्थ्यांना प्रमोट केल्यास काहीच हरकत नाही. उगाच थोड्या दिवसांसाठी प्रशासनानेही रिस्क घेऊ नये.

सुरेश काळबांडे, पालक

- जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक उपाययोजना करू

आमची पूर्ण तयारी आहे. ९ ते १२ च्या शाळा सुरू करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्या सर्व उपाययोजना करू. आता कुठे शासनाने आदेश काढला आहे. त्यावर जिल्हाधिकारी काय आदेश देतात, त्यावर निर्भर आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शाळा सुरू करण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहे, त्या निश्चितच पूर्ण करू, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.