शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, आंबाही गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची नासाडी झाली. गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नागपुरात सकाळी ७ नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार, ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. मात्र, काटोल आणि नरखेड तालुक्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही किरकोळ पावसाची नोंद झाली. कामठी तालुक्यात काही गावांमध्ये तसेच नरखेड तालुक्यात जलालखेडा आणि मेंढला येथे चांगला पाऊस झाला. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. खांबाडा, खडीपौनी, कलानगोंदी या गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळाल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

...

शेतीला फटका

नरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळी ७ च्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात कापून ठेवलेल्या चणा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी चण्याचे पीक कापणीला आले आहे, तर काही ठिकाणी जमिनीवर कापून टाकले आहे. गहू, चणा, भाजीपाला, पिकाला मोठा फटका बसला. बुधवारी रात्रीपासून नरखेड तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी अंबाडा, थंडीपवनी, तारा उतारा, खलानगोंदी परिसरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता. शासनाने तातडीने पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

...

कोट

गतवर्षी कोरोनामुळे त्रस्त झालो होतो. परत कोरोनाची दुसरी लाट उसळली. आता तर अवकाळी पाऊसही पाठ सोडत नाही. गहू, चणा, पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यावी.

- मिथून कठाने, शेतकरी तारा (जलालखेडा)

...

वातावरण थंडावले

ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून, तापमानही खालावले होते. सकाळी १० नंतर पाऊस गायब झाला. नागपुरातील तापमानाच ५.२ अंश सेल्सिअसची घट होऊन तापमान ३१.६ अंश सेल्सिअसवर आले. चंद्रपूरातील तापमानही ४.८ अंशाने खालावून ३३.६ अंश सेल्सिअसवर आले. अकोला, वाशिम, गडचिरोली यवतमाळ वगळता सर्वच जिलह्यात तापमान खालावले होते. गोंदीयामध्ये ३२ अंशाची तर वर्धामध्ये ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.

...

आज वादळी पाऊस

वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून, १९ मार्चला वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळाचा वेग असेल, असेही वर्तविण्यात आले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या चार जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. २० तारखेलाही विदर्भातील सर्वच जिल्ह्यात गेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

...