शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

अर्थसंकल्पात अवास्तव उत्पन्न दर्शविले

By admin | Updated: June 29, 2015 03:10 IST

महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात अवास्तव उत्पन्न दशंविण्यात आले आहे.

युनियनचा आरोप : अर्थसंकल्प नामंजूर करण्याची मागणीनागपूर : महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात अवास्तव उत्पन्न दशंविण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प कामगारविरोधी व खासगीकरणाकडे नेणारा असल्याने सभागृहाने याला मंजूर करू नये, अशी मागणी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनने केली आहे. १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द होणार आहे. परंतु प्रस्तावित अर्थसंकल्पात एलबीटीपासून ४५० कोटींचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प १९४२ की १६४२ कोटींचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० जुलैपर्यंत एलबीटीपासून १४० कोटींचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यातच एलबीटी न भरणाऱ्यांना सरकारने व्याज व दंड माफ केला आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत प्रस्तावित व सुरू असलेल्या प्रकल्पात मनपाला ३० टक्के निधी द्यावा लागणार आहे. या प्रकल्पांना विलंब झाल्यास खर्चात वाढ होणार आहे. हा बोजा मनपावर पडणार आहे. अशा १२ प्रकल्पांवर मनपाने ४२२.११ कोटी रु. खर्च केले आहे. अर्थसंकल्पात ही बाब दर्शविण्यात आलेली नाही. प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला सभागृहाची मंजुरी घेण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात आस्थापना, प्रशासकीय व दुरुस्तीचा खर्च एकत्रित दर्शविण्यात आला आहे. आस्थापना खर्च हा स्वतंत्र दर्शविण्यात यावा. रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणे, कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. वास्तवावर आधारित नसल्याने तो मंजूर करू नये, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी केली आहे.(प्रतिनिधी)