कारवाईची तयारी : नागपुरात शंभरावर धोकादायक इमारतीनागपूर : तीननळ चौकातील सात मजली पंजवानी मार्केट सील करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुरू केली आहे. सोबतच शहरातील असुरक्षित इमारतींची माहिती विभागाने गोळा केली असून या इमारतींच्या विरोधात टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची तयारी केली आहे.महाराष्ट्र अग्निशमन सेवा २००८च्या कायद्यानुसार इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु शहरातील शंभरहून अधिक इमारतीत आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना नाहीत. अशा इमारतींना नोटीस बजावून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना केली जाते. त्यानुसार उपाययोजना न केल्यास इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडीत करून कायदेशीर कारवाई केली जाते. पंजवानी मार्केटमध्ये जुन्या दोन इमारती एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. परंतु या इमारतीला चार जिन्यांची गरज असताना एकच जिना ठेवण्यात आला आहे. ही इमारत उभारताना अग्निशमन विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ९ डिसेंबर २०१४ रोजी विभागाने ही इमारत असुरक्षित घोषित क रून कारवाई सुरू केली होती. परंतु संबंधितांनी यावर अग्निशमन विभागाच्या संचालकांचा स्थगनादेश आणला होते. परंतु या विरोधात सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. यात न्यायालयाने अग्निशमन विभागाच्या बाजूने निर्णय दिल्याने पुन्हा कारवाई सुरू क रण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली. शहरातील अनेक जुन्या इमारतींचे मजले वाढविण्यात आले आहेत. परंतु बांधकामात बदल करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अशा इमारतीत आग लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
असुरक्षित इमारती अग्निशमनच्या रडारवर
By admin | Updated: April 7, 2016 03:07 IST