शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रावरील ६ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा विदर्भावर नाहक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : महाराष्ट्रावर जवळपास ६ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र हे कर्ज राज्यातील फक्त एकाच विभागात खर्च झाल्याची ...

नागपूर : महाराष्ट्रावर जवळपास ६ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र हे कर्ज राज्यातील फक्त एकाच विभागात खर्च झाल्याची जनतेची भावना आहे. त्यामुळे या कर्जातून विदर्भावर नेमका किती खर्च झाला, ही माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्यातील विभागांचा विकास अणि अनुशेषाची माहिती संबंधित विभागाच्या विकास महामंडळाकडून घेतली जाते. मात्र विदर्भ विकास महामंडळातील सर्व पदे रिक्त आहेत. अध्यक्षही नाही. त्यामुळे आम्ही स्वत:हून विदर्भाच्या अनुशेषाची आणि आर्थिक मागासलेपणाची माहिती घेऊन पत्राद्वारे ती राज्यपालांना पाठविली, अशी माहिती रोंघे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, हे कर्ज राज्यातील एकाच विभागावर खर्च झाले असताना त्याचा भार अनुशेष बाकी असलेल्या विदर्भावर पडणे योग्य नाही. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रावर किती खर्च झाला याची माहिती जनतेसमोर यावी.

भारतीय रोड कॉंग्रेसच्या निर्देशानुसार तयार झालेल्या राज्याच्या रस्ते विकास आराखड्याची उद्दिष्टपूर्ती २००१ ते २०१२ होती. ती आता संपत आहे. मात्र या काळात विदर्भाचे उद्दिष्ट फक्त ०.९६८ प्रति चौरस किलोमीटर साध्य झाले. नवी योजना २०२१ ते २०४१ या कालावधीसाठी तयार होत आहे. यात सुधारणा व्हावी. सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठा अनुशेष विदर्भात आहे. नागपूर करारातील कलम ८ नुसार राज्याच्या तिन्ही विभागांना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या देण्याची तरतूद होती. मात्र त्याचे पालन झाले नाही. पोलीस भरती तसेच अन्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीमध्ये योग्य नियोजन आखून तो दूर करता येऊ शकतो. दांडेकर समितीच्या अहवालाचाही विचार योग्यपणे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सिंचनामध्ये विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात प्रचंड अनुशेष आहे. अमरावती विभागाचा अनुशेष १ लाख ६० हजार हेक्टरचा दाखवला जात आहे तर मामा तलावांचा उल्लेख करून नागपूर विभागाचा अनुशेष कमी दाखवला जातो. प्रत्यक्षात मामा तलावांमधून होणारे सिंचन केवळ कागदावरचे आहे. त्यामुळे सिंचनाच्या अनुशेषात दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ. संजय खडक्कर आणि सिंचन व पाण्याचे अभ्यासक प्रवीण महाजन यांची टिप्पणीही राज्यपालांना पत्रासोबत पाठविल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महाविदर्भ जनजागरणचे दिलीप नरवडिया उपस्थित होते.