शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

विद्यापीठाच्या पदव्या असुरक्षित

By admin | Updated: September 30, 2015 06:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज गतीमान करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनाय काणे

योगेश पांडे ल्ल नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज गतीमान करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनाय काणे यांनी केला आहे. मात्र विद्यापीठाचे कामकाज वर्षभरात किती गतीमान झाले, हा संशोधनाचा विषय होईल ! मात्र विद्यापीठाकडून पदव्यांच्या सुरक्षेबाबत किती हलगर्जीपणा करण्यात येतो याचा प्रत्यक्ष अनुभव ‘लोकमत’ प्रतिनिधीने ‘आॅन द स्पॉट’ घेतला. छापील पदव्यांना पुढील प्रक्रियेसाठी दुचाकीवर अगदी पायाच्या शेजारी ठेवून नेण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. पावसाळी वातावरण असतानादेखील या पदव्यांची या पद्धतीनेच ने-आण होत होती. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकाराची विद्यापीठातील अधिकाऱ्यांना माहितीदेखील नाही.नागपूर विद्यापीठाच्या पदवी छापण्याचा कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. या पदवी छापून ‘बॉक्स’मध्ये परीक्षा भवनात आणण्यात येतात व तेथून त्यांची तपासणी झाल्यानंतर या पदवी ‘लॅमिनेशन’साठी नेण्यात येतात. एरवी या पदवी परीक्षा भवनात सुरक्षितपणे ठेवण्यात येतात. परंतु ‘लॅमिनेशन’साठी बाहेर नेत असताना पदवींचा गठ्ठा दुचाकीवर पायाखाली ठेवून नेण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. या पदवीच्या गठ्ठ्यांवर कुठलेही आवरणदेखील नव्हते अन् सर्वात खालच्या पदवीला तर धूळ लागलेली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे पदवींची ने-आण करीत असताना त्या सहजपणे खराब होणे किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे. या बाबीची माहिती असूनदेखील याची अशीच वाहतूक सुरू होती. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पदवीचे फार मोठे महत्त्व असते व या पदवीसाठी ते दिवसरात्र मेहनत करतात. परंतु विद्यापीठाचे प्रशासन मात्र पदवीच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे हा एक मोठा प्रश्नच आहे. .असा प्रकार अयोग्यच : प्र-कुलगुरूयासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. विद्यापीठाच्या पदवींची सुरक्षा आवश्यकच आहे. परंतु जर त्याबाबतीत हलगर्जीपणा होत असेल तर ही अयोग्य बाब आहे. विद्यापीठाचे नवे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित कंपनीला फटकारले असून आता सर्व पदवींची ने-आण ही सुरक्षित पद्धतीनेच होईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती डॉ.येवले यांनी दिली.