शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘शोधगंगा’ ज्ञानप्रवाहातून नागपूर विद्यापीठ ‘गायब’

By admin | Updated: March 5, 2017 01:47 IST

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ?

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ? योगेश पांडे   नागपूर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ या प्रकल्पामुळे देशभरातील विद्यापीठांमधील संशोधकांना नवी दिशा मिळाली. परंतु तंत्रज्ञान व संशोधनाचे मोठमोठे दावे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन मात्र या अनोख्या ज्ञानसागराबाबत उदासीनच आहे. नियमांनुसार प्रत्येक विद्यापीठाला ‘पीएचडी’ प्रबंध येथे ‘अपलोड’ करणे अनिवार्य आहे. इतर विद्यापीठांचे शेकडो शोधप्रबंध संकेतस्थळावर उपलब्ध असताना नागपूर विद्यापीठाचा आकडा अवघा एक इतका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही विद्यापीठाने यासंदर्भात सामंजस्य करार केला नसून आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठातील चांगले संशोधन देशपातळीवर पोहोचण्यास अडचणी येत असून एकाप्रकारे हा संशोधकांवर अन्यायच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ मध्ये एम.फिल व पीएच.डी.साठी नवीन नियमावली लागू केली. भारतातील सर्व विद्यापीठांतील संशोधकांचे अंतिम संशोधन अहवाल एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, या माध्यमातून नवीन संशोधकांना संशोधनातील एकसारखेपणा टाळता यावा व त्यांना प्रबंधांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘शोधगंगा’ व ‘शोधगंगोत्री’ हे प्रकल्प सुरू केले. ‘इन्फ्लिबनेट’ केंद्राच्या माध्यमातून हे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून यांच्यामुळे संशोधकांसाठी माहितीचे खूप महत्त्वाचे संदर्भस्रोत खुले झाले आहेत व एका ‘क्लिक’वर देशातील कुठलाही महत्त्वाचा प्रबंध पाहणे शक्य झाले आहे. देशभरातील शेकडो विद्यापीठांनी यासंदर्भात सामंजस्य करार केलेले असून तेथील संशोधकांचे हजारो प्रबंध आजच्या घडीला सहजपणे उपलब्ध आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने ५ मे २०१६ रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार ‘पीएचडी’ प्रबंधांचे यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर तत्काळ त्याला ‘इन्फ्लिबनेट’च्या माध्यमातून ‘शोधगंगा’ संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे आवश्यक आहे. संशोधनाच्या या ज्ञानसागरापासून नागपूर विद्यापीठ अद्याप दूरच आहे. हा प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे झाली असली तरी नागपूर विद्यापीठाने अद्यापही सामंजस्य करार केलेला नाही. यासाठी प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक पुढाकारदेखील घेण्यात येत नसल्याने संशोधकांची कुचंबणा होत आहे.