शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

‘शोधगंगा’ ज्ञानप्रवाहातून नागपूर विद्यापीठ ‘गायब’

By admin | Updated: March 5, 2017 01:47 IST

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ?

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ? योगेश पांडे   नागपूर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ या प्रकल्पामुळे देशभरातील विद्यापीठांमधील संशोधकांना नवी दिशा मिळाली. परंतु तंत्रज्ञान व संशोधनाचे मोठमोठे दावे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन मात्र या अनोख्या ज्ञानसागराबाबत उदासीनच आहे. नियमांनुसार प्रत्येक विद्यापीठाला ‘पीएचडी’ प्रबंध येथे ‘अपलोड’ करणे अनिवार्य आहे. इतर विद्यापीठांचे शेकडो शोधप्रबंध संकेतस्थळावर उपलब्ध असताना नागपूर विद्यापीठाचा आकडा अवघा एक इतका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही विद्यापीठाने यासंदर्भात सामंजस्य करार केला नसून आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठातील चांगले संशोधन देशपातळीवर पोहोचण्यास अडचणी येत असून एकाप्रकारे हा संशोधकांवर अन्यायच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ मध्ये एम.फिल व पीएच.डी.साठी नवीन नियमावली लागू केली. भारतातील सर्व विद्यापीठांतील संशोधकांचे अंतिम संशोधन अहवाल एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, या माध्यमातून नवीन संशोधकांना संशोधनातील एकसारखेपणा टाळता यावा व त्यांना प्रबंधांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘शोधगंगा’ व ‘शोधगंगोत्री’ हे प्रकल्प सुरू केले. ‘इन्फ्लिबनेट’ केंद्राच्या माध्यमातून हे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून यांच्यामुळे संशोधकांसाठी माहितीचे खूप महत्त्वाचे संदर्भस्रोत खुले झाले आहेत व एका ‘क्लिक’वर देशातील कुठलाही महत्त्वाचा प्रबंध पाहणे शक्य झाले आहे. देशभरातील शेकडो विद्यापीठांनी यासंदर्भात सामंजस्य करार केलेले असून तेथील संशोधकांचे हजारो प्रबंध आजच्या घडीला सहजपणे उपलब्ध आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने ५ मे २०१६ रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार ‘पीएचडी’ प्रबंधांचे यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर तत्काळ त्याला ‘इन्फ्लिबनेट’च्या माध्यमातून ‘शोधगंगा’ संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे आवश्यक आहे. संशोधनाच्या या ज्ञानसागरापासून नागपूर विद्यापीठ अद्याप दूरच आहे. हा प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे झाली असली तरी नागपूर विद्यापीठाने अद्यापही सामंजस्य करार केलेला नाही. यासाठी प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक पुढाकारदेखील घेण्यात येत नसल्याने संशोधकांची कुचंबणा होत आहे.