शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

हिंसक गुन्ह्यांची कारणमीमांसा जाणून घेणार विधी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शहरातील हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शहरातील हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय विधी विद्यापीठाची मंडळी संशोधन करणार आहेत. शहर पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्यात मंगळवारी या संबंधीचा सामंजस्य करार झाला. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी स्वाक्षरी केली.

नागपुरात वारंवार घडणारे रक्तरंजित गुन्हे, हिंसक घटना सर्वत्र चर्चा अन् चिंतनाचा विषय ठरल्या आहे. त्यामुळे त्यामागची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारांची मानसिकता आणि संबंधित कारणांचा बारीकसारीकपणे अभ्यास करतील. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती शहर पोलीस विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाला उपलब्ध करून देतील. त्यानंतर असे गुन्हे कसे रोखायचे, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर तंत्रशुद्ध विचारविमर्श केला जाईल. त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची, उद्बोधनाची गरज आहे, तेसुद्धा ठरवले जाईल आणि नंतर उपाययोजना अमलात आणल्या जातील, असे आजच्या सामंजस्य करारात ठरवण्यात आले. विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंद्रकुमार, ओएसडी (अकॅडमी) प्रा. रमेशकुमार, तर शहर पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे मार्गदर्शक सल्लागार म्हणून भूमिका वठवतील.

----

हे आहे संशोधकांचे पथक

तर, विधी विद्यापीठाचे सहा. प्रा. डॉ. रेंगास्वामी स्टॅलिन (सामाजिक शास्त्र, गुन्हेगारी आणि न्याय वैज्ञानिक शास्त्र), सहा. प्रा. डॉ. हिमांशू पांडे (पुरावा, कायदा), सहा. प्रा. त्रिशा मित्तल (गुन्हेगारी, कायदा) आणि पोलीस विभागाकडून उपायुक्त विनीता साहू, लोहित मतानी, गजानन शिवलिंग राजमाने यांचे संयुक्त पथक संशोधनाचे कार्य करणार आहे.

---