शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

विद्यापीठ टाकतेय ‘कात’

By admin | Updated: May 11, 2015 02:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये संशोधनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकांच्या कक्षेत अडकून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष संशोधनावर विद्यापीठातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत कात टाकल्याचेच दिसून येत आहे. विशेषत: ‘इंडिनय सायन्स कॉंग्रेस’मध्ये झेंडा फडकविल्यानंतर विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचे ठरविले आहे.नागपूर विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांत संशोधन हवे त्या प्रमाणात होत नाही अशी नेहमी ओरड करण्यात येते. परंतु हे वातावरण बदलावे यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’साठी तयारी करण्यासाठी विद्यापीठाला फारच थोडा वेळ मिळाला होता. प्रथमच यात सहभागी होत असतानादेखील कमी वेळात तयार करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी दाद दिली. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाचे नाव अग्रक्रमावर राहावे यासाठी विद्यापीठाकडून धोरण आखण्यात येत आहे.विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा यासाठी राज्यस्तरीय ‘आविष्कार’ या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ‘आविष्कार’साठी निरनिराळ््या महाविद्यालयांतून विद्यापीठाच्या चमूची निवड करण्यात येते. परंतु अनेकदा विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांना संधी मिळत नाही असे चित्र आहे.विदेशातदेखील प्राध्यापकांचा झेंडाविज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापकांचे तर देशासोबतच विदेशातदेखील कौतुक होत आहे. अनेक प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निमंत्रण येत आहेत. शिवाय विविध प्रकल्पांवरदेखील पदव्युत्तर विज्ञान विभागांतील प्राध्यापक काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही बाबी अत्यावश्यक आहे. या दोन्ही क्षेत्रात विद्यापीठातून जास्तीत जास्त संशोधन झाले पाहिजे. यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.