शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ टाकतेय ‘कात’

By admin | Updated: May 11, 2015 02:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये संशोधनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकांच्या कक्षेत अडकून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष संशोधनावर विद्यापीठातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत कात टाकल्याचेच दिसून येत आहे. विशेषत: ‘इंडिनय सायन्स कॉंग्रेस’मध्ये झेंडा फडकविल्यानंतर विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचे ठरविले आहे.नागपूर विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांत संशोधन हवे त्या प्रमाणात होत नाही अशी नेहमी ओरड करण्यात येते. परंतु हे वातावरण बदलावे यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’साठी तयारी करण्यासाठी विद्यापीठाला फारच थोडा वेळ मिळाला होता. प्रथमच यात सहभागी होत असतानादेखील कमी वेळात तयार करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी दाद दिली. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाचे नाव अग्रक्रमावर राहावे यासाठी विद्यापीठाकडून धोरण आखण्यात येत आहे.विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा यासाठी राज्यस्तरीय ‘आविष्कार’ या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ‘आविष्कार’साठी निरनिराळ््या महाविद्यालयांतून विद्यापीठाच्या चमूची निवड करण्यात येते. परंतु अनेकदा विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांना संधी मिळत नाही असे चित्र आहे.विदेशातदेखील प्राध्यापकांचा झेंडाविज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापकांचे तर देशासोबतच विदेशातदेखील कौतुक होत आहे. अनेक प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निमंत्रण येत आहेत. शिवाय विविध प्रकल्पांवरदेखील पदव्युत्तर विज्ञान विभागांतील प्राध्यापक काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही बाबी अत्यावश्यक आहे. या दोन्ही क्षेत्रात विद्यापीठातून जास्तीत जास्त संशोधन झाले पाहिजे. यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.