शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ टाकतेय ‘कात’

By admin | Updated: May 11, 2015 02:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये संशोधनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकांच्या कक्षेत अडकून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष संशोधनावर विद्यापीठातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत कात टाकल्याचेच दिसून येत आहे. विशेषत: ‘इंडिनय सायन्स कॉंग्रेस’मध्ये झेंडा फडकविल्यानंतर विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचे ठरविले आहे.नागपूर विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांत संशोधन हवे त्या प्रमाणात होत नाही अशी नेहमी ओरड करण्यात येते. परंतु हे वातावरण बदलावे यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’साठी तयारी करण्यासाठी विद्यापीठाला फारच थोडा वेळ मिळाला होता. प्रथमच यात सहभागी होत असतानादेखील कमी वेळात तयार करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी दाद दिली. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाचे नाव अग्रक्रमावर राहावे यासाठी विद्यापीठाकडून धोरण आखण्यात येत आहे.विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा यासाठी राज्यस्तरीय ‘आविष्कार’ या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ‘आविष्कार’साठी निरनिराळ््या महाविद्यालयांतून विद्यापीठाच्या चमूची निवड करण्यात येते. परंतु अनेकदा विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांना संधी मिळत नाही असे चित्र आहे.विदेशातदेखील प्राध्यापकांचा झेंडाविज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापकांचे तर देशासोबतच विदेशातदेखील कौतुक होत आहे. अनेक प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निमंत्रण येत आहेत. शिवाय विविध प्रकल्पांवरदेखील पदव्युत्तर विज्ञान विभागांतील प्राध्यापक काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही बाबी अत्यावश्यक आहे. या दोन्ही क्षेत्रात विद्यापीठातून जास्तीत जास्त संशोधन झाले पाहिजे. यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.