शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

विद्यापीठांमध्ये पारदर्शकता हवी : बनवारीलाल पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:23 IST

देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाचा १०५ वा दीक्षांत समारंभ संपन्न

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा नेत्रहीन विद्यार्थी राहुल बजाज याला ‘एलएलबी’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. नागपूर विद्यापीठात मी शिक्षण घेतले आहे व या विद्यापीठामुळेच मी घडलो. विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. मात्र आणखी सुधारणांची आवश्यकता आहे. नागपूर विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ झाले पाहिजे, असे बनवारीलाल पुरोहित म्हणाले.देशाला संपन्न व समृद्ध करण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी आपले राहणीमान साधे ठेवणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणाची कास धरली पाहिजे. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण असतो, मात्र तो शाश्वत असतो. यासाठी विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.नागपूर विद्यापीठाने ‘डिजिटलायझेशन’मध्ये सर्व विद्यापीठांहून सरस काम केले असून आता पदवीदेखील ‘आॅनलाईन’ मिळणार आहे. नागपूर विद्यापीठ राज्यात सर्वात लवकर निकाल जाहीर करणारे विद्यापीठ आहे, अशी माहिती डॉ.काणे यांनी दिली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य व चार विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. प्रा.कोमल ठाकरे व वर्षा देशपांडे यांनी संचालन केले.नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत सोहळ्यात पदकविजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच वर्चस्व दिसून आले. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल सुनील बजाज (एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रम) याला सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्रदान करण्यात आली तर ‘सेंट्रल इंडिया कॉलेज आॅफ लॉ’चा विद्यार्थी सौरभ शरद त्रिवेदी (एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रम) याला १३ पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. शासकीय विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी रचना प्रकाश कनोजिया (बीएसस्सी) व श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली सुरेंद्र पेशवे (बीए) या दोघींचा प्रत्येकी १२ पदके-पारितोषिकांनी सन्मान झाला. 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठBanvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित