शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मानवी भावनांची सार्वत्रिकता मांडणारे नाट्य

By admin | Updated: October 4, 2015 03:26 IST

जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत:...

महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग नागपूर : जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत: १९७५ ते ८५ हा काळ अनेक स्थित्यंतरांचा होता. परिस्थिती बदलत होती आणि गावातील वातावरण. जुने लोक जुने सोडायला तयार नव्हते आणि नवी पिढी शहरातील आधुनिक राहणीमानाकडे, नोकरी, पैसा याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होत होती. पण गावातील शेती, घरातील मोठ्या माणसांचा आदर करण्याची मूल्य, परंपरा पाळताना त्याचा अब्रूशी असणारा तत्कालिक विचार आणि यातूनच प्रत्येकच पिढीत असणारा नव्या-जुन्याचा संघर्ष हे सारेच आपण सातत्याने आजूबाजूला अनुभवत असतो. या सगळ्यांचा संबंध थेट मानवी भावनांशी, त्याच्या स्वार्थाशी आणि आपुलकीशीही आहे. काळ बदलला, प्रश्न बदलले पण मानवी गुंतागुंत वेगवेगळ्या प्रवाहाने सारखीच आहे. मानवी भावनांची हीच सार्वत्रिकता मांडणारे नाट्य म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’. जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित या नाटकाचे दोन प्रयोग शनिवारी डॉ. देशपांडे सभागृहात सिद्धीविनायक पब्लिसिटीने आयोजित केले होते. या नाटकाची पार्श्वभूमी विदर्भातील असल्याने वऱ्हाडी भाषा आणि लेखक महेश एलकुंचवार नागपूरचे असल्याने रसिक नाटकाशी अधिक ‘रिलेट’ झाले. खूप अलंकृत संवाद नाही, घटनांची फारशी गुंतागुंत नाही आणि काही वेळेला संथ होणारे नाटक म्हणजे सहजपणे घरात घडणाऱ्या घटना, चर्चा, राग, लोभ या भावना अनुभवताना नकळत रसिकांनाही या साऱ्या घटना त्यांच्याच आयुष्यात घडल्यासारख्या वाटतात, हेच या नाटकाचे यश आहे. नाटक बऱ्याच प्रसंगात संथ होत असले तरी हा संथपणाच या नाटकाचा अवकाशही आहे आणि हा अवकाश अर्थपूर्ण आहे, याची प्रचिती पाहताना येते. मुळात सर्वच कलावंतांनी अगदी सहज केलेला अभिनय, गोळीबंद संहिता आणि संहितेचा विचार करून केलेले दिग्दर्शन यामुळे हे नाटक रसिकांना बांधून ठेवणारे होते. यात निवेदिता जोशी-सराफ, भारती पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आहेत. देहबोली आणि परिणामकारक टायमिंग, सहज होणारी संवादफेक हे या कसलेल्या कलावंतांचे वैशिष्ट्यच होते. २० वर्षानंतर रंगभूमीवर आलेले ‘वाडा चिरेबंदी’ आत्ताच्या पिढीला प्रथमच अनुभवता आले. (प्रतिनिधी)