शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

मानवी भावनांची सार्वत्रिकता मांडणारे नाट्य

By admin | Updated: October 4, 2015 03:26 IST

जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत:...

महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग नागपूर : जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत: १९७५ ते ८५ हा काळ अनेक स्थित्यंतरांचा होता. परिस्थिती बदलत होती आणि गावातील वातावरण. जुने लोक जुने सोडायला तयार नव्हते आणि नवी पिढी शहरातील आधुनिक राहणीमानाकडे, नोकरी, पैसा याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होत होती. पण गावातील शेती, घरातील मोठ्या माणसांचा आदर करण्याची मूल्य, परंपरा पाळताना त्याचा अब्रूशी असणारा तत्कालिक विचार आणि यातूनच प्रत्येकच पिढीत असणारा नव्या-जुन्याचा संघर्ष हे सारेच आपण सातत्याने आजूबाजूला अनुभवत असतो. या सगळ्यांचा संबंध थेट मानवी भावनांशी, त्याच्या स्वार्थाशी आणि आपुलकीशीही आहे. काळ बदलला, प्रश्न बदलले पण मानवी गुंतागुंत वेगवेगळ्या प्रवाहाने सारखीच आहे. मानवी भावनांची हीच सार्वत्रिकता मांडणारे नाट्य म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’. जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित या नाटकाचे दोन प्रयोग शनिवारी डॉ. देशपांडे सभागृहात सिद्धीविनायक पब्लिसिटीने आयोजित केले होते. या नाटकाची पार्श्वभूमी विदर्भातील असल्याने वऱ्हाडी भाषा आणि लेखक महेश एलकुंचवार नागपूरचे असल्याने रसिक नाटकाशी अधिक ‘रिलेट’ झाले. खूप अलंकृत संवाद नाही, घटनांची फारशी गुंतागुंत नाही आणि काही वेळेला संथ होणारे नाटक म्हणजे सहजपणे घरात घडणाऱ्या घटना, चर्चा, राग, लोभ या भावना अनुभवताना नकळत रसिकांनाही या साऱ्या घटना त्यांच्याच आयुष्यात घडल्यासारख्या वाटतात, हेच या नाटकाचे यश आहे. नाटक बऱ्याच प्रसंगात संथ होत असले तरी हा संथपणाच या नाटकाचा अवकाशही आहे आणि हा अवकाश अर्थपूर्ण आहे, याची प्रचिती पाहताना येते. मुळात सर्वच कलावंतांनी अगदी सहज केलेला अभिनय, गोळीबंद संहिता आणि संहितेचा विचार करून केलेले दिग्दर्शन यामुळे हे नाटक रसिकांना बांधून ठेवणारे होते. यात निवेदिता जोशी-सराफ, भारती पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आहेत. देहबोली आणि परिणामकारक टायमिंग, सहज होणारी संवादफेक हे या कसलेल्या कलावंतांचे वैशिष्ट्यच होते. २० वर्षानंतर रंगभूमीवर आलेले ‘वाडा चिरेबंदी’ आत्ताच्या पिढीला प्रथमच अनुभवता आले. (प्रतिनिधी)