शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म

By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST

हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला,

जितेन्द्रनाथ महाराज : राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला प्रारंभ नागपूर : हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला, याचा इतिहास आहे. आज बऱ्याच काळानंतर हिंदू समाज एकत्रित होतो आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही आपल्याला दिसत आहेत. हिंदू एकजूट होत असल्याचे पाहून मात्र जग काळजीत पडले आहे. जगात हिंदू धर्मच शांतता निर्माण करू शकतो आणि जगाला मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म आहे, असे मत देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी गुरुवारी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती, महाल आणि राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचे आयोजन चिटणीस पार्क, महाल येथे करण्यात आले आहे.या महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी द्वितीय मधुराद्वैताचार्य श्री बाबाजी महाराज पंडित कीर्तन परिसरात ‘देव, देश आणि धर्म’ विषयावरील उद्बोधनात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दिलीप गुप्ता, प्रकाश वाघमारे, संयोजक श्रीपाद रिसालदार उपस्थित होते. महाराज म्हणाले, भगवान दत्ताला तीन मुखे आहेत तसेच देव, देश आणि धर्म आहे. देशाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय देश नाही. धर्मपालनाशिवाय मात्र देव आणि देश यांचा काहीही अर्थ उरत नाही. हिंदूच्या एकजूटीने प्रथमच भारतीय संसदेला भारतमातेचे सर्वोच्च मंदिर म्हणणारा आणि त्याच्यासमोर नतमस्तक होणारा पंतप्रधान आपल्याला लाभला. देशाच्या प्रगतीसाठी भविष्यातही हिंदूंना एकजूट वाढवावी लागेल. भारताविषयी उपेक्षेने बोलणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आज तिरंग्याला सलाम करण्यासाठी भारतात येण्याची इच्छा आहे. पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीच्या नावावर आरक्षण देऊन हा भेद वाढविला जातो आहे. आरक्षणाला विरोध नाही पण ते जातीच्या आधारापेक्षा कमजोर वर्गाला दिले गेले पाहिजे. आपल्या देशात शिवाजी महाराजांचे चरित्र इयत्ता पहिली ते पाचवी शिकविले जाते. या काळात मुलांना काहीही कळत नाही. पाचवीनंतर मात्र कळायला लागल्यावर ब्रिटिशांचा इतिहास शिकविला जातो. राज्य शासनाने यात बदल करायला हवा. विकास महत्त्वाचा आहे पण त्याने संस्कार संपायला नको, असे ते म्हणाले. संस्कार संपत असल्याने आमची संवेदनशीलता आणि नात्यांमधली वीणही सैल होते आहे. विकास हवा आहे पण संस्कारांसोबत हवा आहे. त्यासाठी आपला धर्म, देश आणि संस्कृती यांची जपणूक करण्याची गरज आहे. देशासमोर अनेक धोके आहे आणि त्यांना शह देण्याची शक्ती हिंदूच्या संघटनेतच आहे, यासाठी हिंदूंनी संघटित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी कीर्तन महोत्सव समितीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाल परिसरात या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न सूरज वाशिमकर आणि सहकारी यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. या महोत्सवाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)