शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी धावली अनोळखी माणसे

By admin | Updated: December 20, 2015 02:53 IST

आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे.

उपाशी आंदोलन करणाऱ्यांना दिले भोजन : टेकडी हनुमान मंदिर समितीचे दातृत्वनागपूर : आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे. राज्य शासनाने त्यांची दखल घेतली नाही म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन करीत आहे. न्याय मागण्यांसाठी आंदोलन करताना तब्बल पाच दिवस झाले. जवळचे पैसे संपले आणि उपासमार व्हायला लागली. एका धर्मार्थ संस्थेला त्यांची व्यथा कळली आणि माणुसकीचा गहिवर पाझरला. या संस्थेने आंदोलनकर्त्यांना भोजन देऊ केले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले.आंदोलनकर्ते भुकेने व्याकुळ होत होते आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. पक्की नोकरी मिळावी म्हणून हजारो संगणक परिचालक शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. तब्बल पाच दिवस झाले पण शासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. १६ जिसेंबर रोजी आंदोलनकारी हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शासनाने मागण्या पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अनेक आंदोलनकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. यात काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.माणसांना जोडणारा सेतू नागपूर : सरकारला आपल्या मागण्या सांगितल्यावर आश्वासन मिळताच एक वा दोन दिवसात परत जाण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे कुणीच आवश्यक पैसे घेऊन आलेले नाही. दोन दिवसातच पैसेही संपले. तिसऱ्या दिवशी भोजन करण्यासाठीही पैसे उरले नाही. अखेर केळी खाऊन कसाबसा दिवस काढला. आंदोलकांची ही स्थिती पाहून टेकडी मार्गावरील हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व्यथित झाले. कारण नसताना लहान मुले आणि महिलांची उपासमार त्यांना अस्वस्थ करणारी होती. सरकार ऐको वा नाही पण या आंदोलनकर्त्यांना मदत करायचा निर्णय समितीने घेतला आणि या समितीने त्यांना भोजन उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या समितीने शुक्रवार दुपारपासून आंदोलनकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. समितीचे पदाधिकारी या आंदोलनकर्त्यांना ओळखतही नाही पण माणुसकीचा हा गहिवर माणसांना जोडणारा सेतू झाला. भोजन मिळाल्यामुळे भुकेने व्याकुळलेल्या लहान मुलांचे हाल संपले आणि आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री त्यांना भरपेट पुलाव दिला. शनिवारी भात, बेसन आणि कढीचे भोजन दिले. परक्या शहरात कुणीही ओळखीचे नसताना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांसाठी ही मदत महत्त्वाची आणि प्रशंसनीय आहे. काहीही संबंध नसताना मंदिर समिती आंदोलकांच्या मदतीला धावून आली. राज्य सरकारने त्यांच्याकडून आदर्श घेतला तर हजारो संगणक परिचालकांचे आयुष्य बदलू शकेल, असे मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.(प्रतिनिधी)