शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी धावली अनोळखी माणसे

By admin | Updated: December 20, 2015 02:53 IST

आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे.

उपाशी आंदोलन करणाऱ्यांना दिले भोजन : टेकडी हनुमान मंदिर समितीचे दातृत्वनागपूर : आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे. राज्य शासनाने त्यांची दखल घेतली नाही म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन करीत आहे. न्याय मागण्यांसाठी आंदोलन करताना तब्बल पाच दिवस झाले. जवळचे पैसे संपले आणि उपासमार व्हायला लागली. एका धर्मार्थ संस्थेला त्यांची व्यथा कळली आणि माणुसकीचा गहिवर पाझरला. या संस्थेने आंदोलनकर्त्यांना भोजन देऊ केले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले.आंदोलनकर्ते भुकेने व्याकुळ होत होते आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. पक्की नोकरी मिळावी म्हणून हजारो संगणक परिचालक शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. तब्बल पाच दिवस झाले पण शासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. १६ जिसेंबर रोजी आंदोलनकारी हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शासनाने मागण्या पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अनेक आंदोलनकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. यात काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.माणसांना जोडणारा सेतू नागपूर : सरकारला आपल्या मागण्या सांगितल्यावर आश्वासन मिळताच एक वा दोन दिवसात परत जाण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे कुणीच आवश्यक पैसे घेऊन आलेले नाही. दोन दिवसातच पैसेही संपले. तिसऱ्या दिवशी भोजन करण्यासाठीही पैसे उरले नाही. अखेर केळी खाऊन कसाबसा दिवस काढला. आंदोलकांची ही स्थिती पाहून टेकडी मार्गावरील हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व्यथित झाले. कारण नसताना लहान मुले आणि महिलांची उपासमार त्यांना अस्वस्थ करणारी होती. सरकार ऐको वा नाही पण या आंदोलनकर्त्यांना मदत करायचा निर्णय समितीने घेतला आणि या समितीने त्यांना भोजन उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या समितीने शुक्रवार दुपारपासून आंदोलनकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. समितीचे पदाधिकारी या आंदोलनकर्त्यांना ओळखतही नाही पण माणुसकीचा हा गहिवर माणसांना जोडणारा सेतू झाला. भोजन मिळाल्यामुळे भुकेने व्याकुळलेल्या लहान मुलांचे हाल संपले आणि आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री त्यांना भरपेट पुलाव दिला. शनिवारी भात, बेसन आणि कढीचे भोजन दिले. परक्या शहरात कुणीही ओळखीचे नसताना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांसाठी ही मदत महत्त्वाची आणि प्रशंसनीय आहे. काहीही संबंध नसताना मंदिर समिती आंदोलकांच्या मदतीला धावून आली. राज्य सरकारने त्यांच्याकडून आदर्श घेतला तर हजारो संगणक परिचालकांचे आयुष्य बदलू शकेल, असे मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.(प्रतिनिधी)