शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी धावली अनोळखी माणसे

By admin | Updated: December 20, 2015 02:53 IST

आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे.

उपाशी आंदोलन करणाऱ्यांना दिले भोजन : टेकडी हनुमान मंदिर समितीचे दातृत्वनागपूर : आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे. राज्य शासनाने त्यांची दखल घेतली नाही म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन करीत आहे. न्याय मागण्यांसाठी आंदोलन करताना तब्बल पाच दिवस झाले. जवळचे पैसे संपले आणि उपासमार व्हायला लागली. एका धर्मार्थ संस्थेला त्यांची व्यथा कळली आणि माणुसकीचा गहिवर पाझरला. या संस्थेने आंदोलनकर्त्यांना भोजन देऊ केले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले.आंदोलनकर्ते भुकेने व्याकुळ होत होते आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. पक्की नोकरी मिळावी म्हणून हजारो संगणक परिचालक शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. तब्बल पाच दिवस झाले पण शासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. १६ जिसेंबर रोजी आंदोलनकारी हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शासनाने मागण्या पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अनेक आंदोलनकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. यात काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.माणसांना जोडणारा सेतू नागपूर : सरकारला आपल्या मागण्या सांगितल्यावर आश्वासन मिळताच एक वा दोन दिवसात परत जाण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे कुणीच आवश्यक पैसे घेऊन आलेले नाही. दोन दिवसातच पैसेही संपले. तिसऱ्या दिवशी भोजन करण्यासाठीही पैसे उरले नाही. अखेर केळी खाऊन कसाबसा दिवस काढला. आंदोलकांची ही स्थिती पाहून टेकडी मार्गावरील हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व्यथित झाले. कारण नसताना लहान मुले आणि महिलांची उपासमार त्यांना अस्वस्थ करणारी होती. सरकार ऐको वा नाही पण या आंदोलनकर्त्यांना मदत करायचा निर्णय समितीने घेतला आणि या समितीने त्यांना भोजन उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या समितीने शुक्रवार दुपारपासून आंदोलनकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. समितीचे पदाधिकारी या आंदोलनकर्त्यांना ओळखतही नाही पण माणुसकीचा हा गहिवर माणसांना जोडणारा सेतू झाला. भोजन मिळाल्यामुळे भुकेने व्याकुळलेल्या लहान मुलांचे हाल संपले आणि आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री त्यांना भरपेट पुलाव दिला. शनिवारी भात, बेसन आणि कढीचे भोजन दिले. परक्या शहरात कुणीही ओळखीचे नसताना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांसाठी ही मदत महत्त्वाची आणि प्रशंसनीय आहे. काहीही संबंध नसताना मंदिर समिती आंदोलकांच्या मदतीला धावून आली. राज्य सरकारने त्यांच्याकडून आदर्श घेतला तर हजारो संगणक परिचालकांचे आयुष्य बदलू शकेल, असे मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.(प्रतिनिधी)