शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर बेरोजगारीची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:22 IST

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ७१२ कर्मचाºयांची नोकरी गेली : नागपुरात सीईओ यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून सेवा देणाºया या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिल्याने राज्यातील ७१२ कर्मचाºयांची सेवा संपली आहे. रोजगार देण्याचा दावा करणाºया सरकारकडून असलेला बेरोजगारीच्या अंधारात ढकलण्यात आल्याचा आरोप या कर्मचाºयांनी केला आहे.नागपूर जिल्ह्यातील बेरोजगार झालेल्या या कर्मचाºयांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांना निवेदन सोपविले. शिष्ठमंडळातील प्रतिनिधी रोहित जयस्वाल यांनी सांगितले की, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) अंतर्गत २००७ पासून पीएचसीमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होत आहेत. त्याअंतर्गत दरवर्षी त्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात येते. यावर्षीही एप्रिल २०१७ मध्ये या कर्मचाºयांचे कंत्राट रिन्यू झाले असून मार्च २०१८ पर्यंत त्यांच्या नियुक्तीची मुदत आहे. मात्र राज्य शासनाने मुदतीपूर्वीच ३१ आॅक्टोबरला प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदे नामंजूर करून या सर्व कर्मचाºयांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढले. त्यामुळे हे सर्व कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांना कायम करण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाने समान काम समान वेतन या तत्त्वावर त्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार एका समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र शासनाने त्यापूर्वीच नियुक्त रद्द करून त्यांच्यावर संकट ओढवल्याचे रोहित जयस्वाल यांनी सांगितले. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी केवळ ८००० रुपये या नाममात्र वेतनावर सेवा देत आहेत. याअंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांचे मलेरिया तपासणीसह टीएलसी, डीएलसी, एचबी, प्लेटलेट्स, एचआयव्ही, ब्लड शुगर, हिपॅटेटीस, स्पुटॉन, व्हिडॉल, आरडीके, युरीन मायक्रोस्कोपी, बीटी/सीटी, युपीटी आदी आजारांची तपासणी करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात होते. या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे. या कर्मचाºयांना सात दिवसात पूर्ववत कामावर न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आमरण उपोषण करण्याचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे. शिष्टमंडळात मनोज शिवणकर, शुभांगी साठवणे, श्रद्धा दरेकर, शितल ठेलकर, प्रीती शिरपूरकर, दर्शना निव्वळ, पांडुरंग नौकरकर, विजया तलमले, परिना शेख आदींचा समावेश होता.