शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नागलवाडी बससेवा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बडेगाव : सावनेर तालुक्यातील दुर्गम भागात नागलवाडी गाव वसले आहे. या गावातील नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बडेगाव : सावनेर तालुक्यातील दुर्गम भागात नागलवाडी गाव वसले आहे. या गावातील नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल बघता येथील बससेवा पूर्ववत सुरू करा, या मागणीसाठी भीम आर्मीने सावनेर एसटी आगाराचे व्यवस्थापक रामटेके यांच्याकडे निवेदन दिले. बससेवा सुरू न केल्यास तीव्र आंदाेलनाचा इशाराही भीम आर्मीने दिला आहे.

काेराेनाची स्थिती नियंत्रणात असतानासुद्धा गावात बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना, रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागताे. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नाही तर ऑफलाइनसाठी बस नाही. शिवाय जंगली भाग असल्याने विद्यार्थ्यांना सायकल वा पायी शाळा गाठणे धोक्याचे आहे, हीच समस्या या भागातील रायवाडी, महारकुंड, टेंभूरडोह आणि खर्डूका या गावाची आहे.

त्यामुळे ही बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. अन्यथा आंदाेलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात तहसीलदार सतीश मासाळ, खापा पाेलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मानकर यांनाही निवेदन दिले आहे. यावेळी भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष मयूर नागदवने, शहर अध्यक्ष स्वप्निल लांबघरे, रंजित गजभिये, गौतम गजभिये, प्रज्वल बागडे आदी उपस्थित होते. प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसाेय पाहता ही बससेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे नागलवाडी येथील सरपंच गीता उईके, रायवाडीचे प्रल्हाद गाेहणे, टेंभूरडाेहचे दीपक सहारे, खर्डूका येथील शाेभा भरबत यांनी सांगितले.