शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तिजोरी खाली, पदाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनामुळे यंदा आर्थिक वर्षात शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीला ब्रेक लावला. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यापर्यंत राज्य ...

नागपूर : कोरोनामुळे यंदा आर्थिक वर्षात शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीला ब्रेक लावला. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यापर्यंत राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला येणारे ३० ते ३५ कोटी रुपये यावर्षी अद्यापही मिळू शकले नाही. आता आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास दोन महिने शिल्लक आहेत, तरीही शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्नही फारसे नाही. त्यामुळे या वर्षभरात जिल्हा परिषदेची तिजोरी खालीच राहिली. तिजोरी खाली झाल्याने पदाधिकारीही हतबल झाले आहेत. सध्या तरी जिल्हा परिषदेचा कारभार शिल्लक निधीवरच सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या सेसफंडमध्ये प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी ८० ते ८५ टक्के रक्कम ही शासनाच्या विविध योजनातून प्राप्त होते. तर उर्वरित केवळ १० ते १५ टक्केच उत्पन्न जि.प.चे आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतरण होताच कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला. यादरम्यान संपूर्ण देशात टाळेबंदी लागू झाली. यामुळे यंदाचा अर्थसंकल्पही तत्कालीन सीईओ संजय यादव यांनीच सादर केला. वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प ३३ कोटी ८९ लाखाचा होता. सध्या १० महिन्याचा कालावधी लोटला असताना जि.प.च्या तिजोरीमध्ये ठणठणाटच आहे. त्यातच यापूर्वीच २० मे २०२० रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी फक्त आवश्यक बाबींवरच खर्च करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे समाजकल्याण, शिक्षण, कृषी, महिला व बाल या विभागामार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, दिव्यांग, बेरोजगार आदींसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजना रखडलेल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी अर्थसंकल्पात तरतूद असलेला निधी रोखून धरल्याची माहिती आहे. मुद्रांक शुल्कातून जिल्हा परिषदेला २२ ते २५ कोटी रुपयाचा निधी मिळतो. सरकारकडून मुद्रांक शुल्कात कपात केल्याने जिल्हा परिषदेचे सात ते आठ कोटीचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जाते. मुद्रांक शुल्काचे शासनाकडून १८ कोटीचे अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वित्त व लेखा विभागाने राज्य शासनाला पाठविला आहे. मात्र अद्यापही शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही.