शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सीआरपीसी कलम ४८२ मध्ये हायकोर्टाला अमर्याद अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:12 IST

फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देणे याकरिता आवश्यक तो निर्णय देऊ शकते अशी माहिती प्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी दिली.

ठळक मुद्देअ‍ॅड. राजेंद्र डागा यांची माहिती : हायकोर्ट बार असोसिएशनचे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देणे याकरिता आवश्यक तो निर्णय देऊ शकते अशी माहिती प्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी दिली.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत अ‍ॅड. डागा यांचे ‘फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४८२ चे पैलू’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत कलम ४८२ मधील अधिकार स्पष्ट केले आहेत. त्यात हरियाणा सरकार वि. भजनलाल, नरेंद्र सिंग वि. पंजाब सरकार, मध्य प्रदेश सरकार वि. लक्ष्मी नारायण इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे. या अधिकारांतर्गत उच्च न्यायालय एफआयआर, दोषारोपपत्र, तडजोडीयोग्य प्रकरणे, दिवाणी वाद, व्यावसायिक व्यवहार इत्यादी प्रकरणे केवळ प्राथमिक मुद्दे विचारात घेऊन रद्द करू शकते. असे असले तरी वकिलांनी या कलमांतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी स्वत:च विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे. संबंधित प्रकरण कायद्यात बसत असेल तरच याचिका दाखल करावी. निरर्थक याचिका दाखल करून न्यायालयावर कामाचे ओझे वाढवू नये. पक्षकारांना विश्वासात घेऊन कायद्याची बाजू स्पष्ट करून सांगावी असे अ‍ॅड. डागा यांनी पुढे बोलताना सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल