शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सीआरपीसी कलम ४८२ मध्ये हायकोर्टाला अमर्याद अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:12 IST

फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देणे याकरिता आवश्यक तो निर्णय देऊ शकते अशी माहिती प्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी दिली.

ठळक मुद्देअ‍ॅड. राजेंद्र डागा यांची माहिती : हायकोर्ट बार असोसिएशनचे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देणे याकरिता आवश्यक तो निर्णय देऊ शकते अशी माहिती प्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी दिली.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत अ‍ॅड. डागा यांचे ‘फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४८२ चे पैलू’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत कलम ४८२ मधील अधिकार स्पष्ट केले आहेत. त्यात हरियाणा सरकार वि. भजनलाल, नरेंद्र सिंग वि. पंजाब सरकार, मध्य प्रदेश सरकार वि. लक्ष्मी नारायण इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे. या अधिकारांतर्गत उच्च न्यायालय एफआयआर, दोषारोपपत्र, तडजोडीयोग्य प्रकरणे, दिवाणी वाद, व्यावसायिक व्यवहार इत्यादी प्रकरणे केवळ प्राथमिक मुद्दे विचारात घेऊन रद्द करू शकते. असे असले तरी वकिलांनी या कलमांतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी स्वत:च विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे. संबंधित प्रकरण कायद्यात बसत असेल तरच याचिका दाखल करावी. निरर्थक याचिका दाखल करून न्यायालयावर कामाचे ओझे वाढवू नये. पक्षकारांना विश्वासात घेऊन कायद्याची बाजू स्पष्ट करून सांगावी असे अ‍ॅड. डागा यांनी पुढे बोलताना सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल