शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बेशिस्त वाहतुकीवर ‘कंट्रोल’

By admin | Updated: January 15, 2017 02:43 IST

बुटीबोरीच्या मुख्य चौकातील वाहतूक तशी सर्वांसाठी डोकेदुखी... हजारो प्रवासी, विद्यार्थी, कंपनीतील कामगार असो

बुटीबोरीच्या ठाणेदारांनी राबविला अभिनव उपक्रम : प्रवासी वाहनांसाठी केली वेगळी व्यवस्था गणेश खवसे  नागपूर बुटीबोरीच्या मुख्य चौकातील वाहतूक तशी सर्वांसाठी डोकेदुखी... हजारो प्रवासी, विद्यार्थी, कंपनीतील कामगार असो की बुटीबोरीत नानाविध कामासाठी येणारे नागरिक असो, त्यांना मुख्य चौकातील अनियंत्रित आणि बेशिस्त वाहतुकीचा फटका बसला नाही असे यापूर्वी झाले नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी ‘मास्टर प्लान’ तयार केला. त्याचाच एक भाग म्हणून बॅरिकेटस् लावून त्यांनी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत केली. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला लगाम लागला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. बुटीबोरीचा मुख्य चौक हा गजबजलेला चौक असून तेथे अपघाताची शक्यता खूप जास्त प्रमाणात असायची. ही शक्यता लक्षात घेता ३० नोव्हेंबर २०१६ रोजी बुटीबोरी पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी यावर काही उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात का, त्यादृष्टीने विचार केला. सर्वात आधी पोलीस विभागाच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे ‘बॅरिकेटस्’ची मागणी केली. सहा - सात बॅरिकेटस् आल्यानंतर त्यांनी ते चौकात एका कडेला लावून वर्धा - चंद्रपूरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी एकप्रकारे जागा करून दिली. त्यामुळे प्रवासी वाहने तेथे थांबल्यानंतर मागाहून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. त्यातच ‘बॅरिकेटस’च्या आत खासगी वाहन कुणी उभे करून ठेवल्यास त्या वाहनाच्या टायरची हवा सोडली जात. विशेष म्हणजे, हा उपक्रम आजही राबविला जात आहे. यासाठी मुख्य चौकात वाहतूक पोलिसाची नेमणूक केली असून बेशिस्त वाहतूक ‘कंट्रोल’मध्ये आणली आहे. ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठीही आता तेवढा त्रास सहन करावा लागत नाही. परिणामी त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. सीसीटीव्ही, ट्रॅफिक सिग्नलची गरज मुख्य चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. वर्दळीचा चौक म्हणून ओळख असलेल्या बुटीबोरी चौकाएवढी वाहतूक इतर कोणत्याही पोलीस ठाण्यांतर्गत नाही. मात्र त्यामानाने आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याने आम्हालाही मर्यादा येतात. तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरूच आहे. त्याअंतर्गत बॅरिकेटस्चा प्रयोग राबविण्यात आला. चौकातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी चौकात ट्रॅफिक सिग्नलची नितांत गरज आहे. त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास आपोआपच वाहतुकीवर ‘कंट्रोल’ आणता येईल. पोलीस विभाग आपल्या परीने जे काही करता येईल, ते करीत आहेच. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ग्रामपंचायत, आरटीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनीही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. - हेमंत चांदेवार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बुटीबोरी. असा आहे ‘मास्टर प्लान’ बुटीबोरीच्या मुख्य चौकासह एकूणच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, तहसीलदार, आरटीओ यांच्याकडे पत्र पाठविले आहे. त्यात एमआयडीसी चौक येथे फुटपाथकडील भागात डांबरीकरण करण्यात यावे, त्रिमूर्ती बिल्डिंगसमोरील सुकलेले झाड काढण्यात यावे, एमआयडीसी चौक येथे वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, टोल टॅक्स घेणाऱ्या कंपनीकडून रात्रीच्या वेळी एमआयडीसी चौक येथे चकाकणारे जॅकेट परिधान केलेले चार कर्मचारी नेमण्यात यावे, ग्रामपंचायत आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व्यवस्था करावी, हायवे अ‍ॅथॉरिटीकडून दिशादर्शक फलक लावण्यात यावे, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड लिमिटवर उपाय, स्पीड ब्रेकर आदी व्यवस्था करण्यात यावी, एमआयडीसी चौकात असलेले दारूचे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे आदी सूचना ठाणेदार चांदेवार यांनी केल्या आहे. या सूचनांचे पत्र त्यांनी संबंधितांना १४ डिसेंबर २०१६ रोजी पाठविले आहे. परंतु, अद्याप संबंधितांनी त्याची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासन किती सुस्त आहे, याचा प्रत्यय येतो.