शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

युएन केंद्र दहशतवाद्यांचा अड्डा

By admin | Updated: July 31, 2014 01:02 IST

गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे

नागपूर : गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे कॉन्सूलेट जनरल आॅफ इस्रायलचे ‘डेप्युटी चिफ आॅफ मिशन’ मतान जमीर यांनी नागपूर येथे सांगितले.भारतातील सैनिकी शाळांची पाहणी करण्यासाठी जमीर नागपूर येथे आले होते. त्यांनी भोसला सैनिक शाळेला भेट दिल्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे लक्ष गाझापट्टीत सुरू असलेल्या हल्ल्याकडे वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.गाझापट्टीतील युएन केंद्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे वृत्त जगभर विविध वृत्त वाहिन्यांनी दाखविले होते. त्या संदर्भात बोलताना जमीर म्हणाले की, हे केंद्र ‘हमास’ या दशहतवादी संघटनेचे केंद्र झाले होते. तेथे संघटनेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवला होता. तेथून ते इस्रायलमधील शाळा, इस्पितळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करीत होते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत होती. ती टाळण्यासाठी व हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.पॅलेस्टियनला देश म्हणून मान्यता देण्यात इस्रायलचा विरोध नाही, मात्र तरीही ‘हमास’कडून हल्ले होतच आहेत. आम्ही त्यांच्या लगत आहोत, त्यामुळे हे हल्ले अधिक तीव्र होत आहेत. असेच हल्ले पुढच्या काळात नायजेरियावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कट्टर मुस्लीम दहशतवादी संघटनांचा भारतासह इतरही देशांना धोका आहे, याकडे जमीर यांनी लक्ष वेधले.इस्रायलला संघर्ष नको, पण ‘हमास’मुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. तीनवेळा युद्ध विराम झाल्यानंतरही ‘हमास’कडूनच त्याचे उल्लंघन करण्यात आले. नागरी वस्त्या आणि लहान मुलांवर हल्ले करण्यात आले. कोणी हल्ले करीतच असेल तर किती काळ शांत बसायचे, त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. १ हजार ८८ पॅलेस्टियन्स आणि ५६ इस्रायली नागरिक ठार झाल्याचे आकडे माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे.मात्र या आकड्यावर जाऊ नका, रॉकेल मिसाईलचे हल्ले निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा इस्रायलने निर्माण केल्याने आमची मनुष्य हानी कमी झाली आहे, असे जमीर म्हणाले. (प्रतिनिधी)