शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

युएन केंद्र दहशतवाद्यांचा अड्डा

By admin | Updated: July 31, 2014 01:02 IST

गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे

नागपूर : गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे कॉन्सूलेट जनरल आॅफ इस्रायलचे ‘डेप्युटी चिफ आॅफ मिशन’ मतान जमीर यांनी नागपूर येथे सांगितले.भारतातील सैनिकी शाळांची पाहणी करण्यासाठी जमीर नागपूर येथे आले होते. त्यांनी भोसला सैनिक शाळेला भेट दिल्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे लक्ष गाझापट्टीत सुरू असलेल्या हल्ल्याकडे वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.गाझापट्टीतील युएन केंद्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे वृत्त जगभर विविध वृत्त वाहिन्यांनी दाखविले होते. त्या संदर्भात बोलताना जमीर म्हणाले की, हे केंद्र ‘हमास’ या दशहतवादी संघटनेचे केंद्र झाले होते. तेथे संघटनेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवला होता. तेथून ते इस्रायलमधील शाळा, इस्पितळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करीत होते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत होती. ती टाळण्यासाठी व हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.पॅलेस्टियनला देश म्हणून मान्यता देण्यात इस्रायलचा विरोध नाही, मात्र तरीही ‘हमास’कडून हल्ले होतच आहेत. आम्ही त्यांच्या लगत आहोत, त्यामुळे हे हल्ले अधिक तीव्र होत आहेत. असेच हल्ले पुढच्या काळात नायजेरियावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कट्टर मुस्लीम दहशतवादी संघटनांचा भारतासह इतरही देशांना धोका आहे, याकडे जमीर यांनी लक्ष वेधले.इस्रायलला संघर्ष नको, पण ‘हमास’मुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. तीनवेळा युद्ध विराम झाल्यानंतरही ‘हमास’कडूनच त्याचे उल्लंघन करण्यात आले. नागरी वस्त्या आणि लहान मुलांवर हल्ले करण्यात आले. कोणी हल्ले करीतच असेल तर किती काळ शांत बसायचे, त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. १ हजार ८८ पॅलेस्टियन्स आणि ५६ इस्रायली नागरिक ठार झाल्याचे आकडे माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे.मात्र या आकड्यावर जाऊ नका, रॉकेल मिसाईलचे हल्ले निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा इस्रायलने निर्माण केल्याने आमची मनुष्य हानी कमी झाली आहे, असे जमीर म्हणाले. (प्रतिनिधी)