शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

युएन केंद्र दहशतवाद्यांचा अड्डा

By admin | Updated: July 31, 2014 01:02 IST

गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे

नागपूर : गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे कॉन्सूलेट जनरल आॅफ इस्रायलचे ‘डेप्युटी चिफ आॅफ मिशन’ मतान जमीर यांनी नागपूर येथे सांगितले.भारतातील सैनिकी शाळांची पाहणी करण्यासाठी जमीर नागपूर येथे आले होते. त्यांनी भोसला सैनिक शाळेला भेट दिल्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे लक्ष गाझापट्टीत सुरू असलेल्या हल्ल्याकडे वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.गाझापट्टीतील युएन केंद्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे वृत्त जगभर विविध वृत्त वाहिन्यांनी दाखविले होते. त्या संदर्भात बोलताना जमीर म्हणाले की, हे केंद्र ‘हमास’ या दशहतवादी संघटनेचे केंद्र झाले होते. तेथे संघटनेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवला होता. तेथून ते इस्रायलमधील शाळा, इस्पितळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करीत होते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत होती. ती टाळण्यासाठी व हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.पॅलेस्टियनला देश म्हणून मान्यता देण्यात इस्रायलचा विरोध नाही, मात्र तरीही ‘हमास’कडून हल्ले होतच आहेत. आम्ही त्यांच्या लगत आहोत, त्यामुळे हे हल्ले अधिक तीव्र होत आहेत. असेच हल्ले पुढच्या काळात नायजेरियावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कट्टर मुस्लीम दहशतवादी संघटनांचा भारतासह इतरही देशांना धोका आहे, याकडे जमीर यांनी लक्ष वेधले.इस्रायलला संघर्ष नको, पण ‘हमास’मुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. तीनवेळा युद्ध विराम झाल्यानंतरही ‘हमास’कडूनच त्याचे उल्लंघन करण्यात आले. नागरी वस्त्या आणि लहान मुलांवर हल्ले करण्यात आले. कोणी हल्ले करीतच असेल तर किती काळ शांत बसायचे, त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. १ हजार ८८ पॅलेस्टियन्स आणि ५६ इस्रायली नागरिक ठार झाल्याचे आकडे माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे.मात्र या आकड्यावर जाऊ नका, रॉकेल मिसाईलचे हल्ले निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा इस्रायलने निर्माण केल्याने आमची मनुष्य हानी कमी झाली आहे, असे जमीर म्हणाले. (प्रतिनिधी)