शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडच्या ‘सच्चिदानंद’ची पत घसरली

By admin | Updated: July 23, 2015 02:56 IST

बुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत.

अभय लांजेवार उमरेडबुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत. आपल्या घामाचा पैसा गुंतवल्यानंतर मुदतीअंती आपली रक्कम व्याजासह परत मागण्यासाठी अनेकजण या संस्थेच्या दोनमजली इमारतीत सध्या येरझाऱ्या मारीत आहेत. संस्थेत येणाऱ्यांना ‘सध्याच पैसे नाही, आणखी काही दिवस थांबा’ अशापद्धतीने थांबविले जाते. यामुळे आल्यापावलीच निराशेने परत जाण्याचा प्रकार गुंतवणूकदारांसोबत होत असून आपल्याच पैशासाठी अनेकदा चकरा मारणाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. तर दुसरीकडे संस्थेने जोरजबरदस्तीने ‘तारखेवर तारीख’ वाढवून देण्याचा सपाटाच सुरू केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. उमरेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या जात असून दुय्यम निबंधक ‘तुम्ही मला विचारून रक्कम ठेवली होती का’ अशा शब्दात आमची हेटाळणी करीत असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे.सुमारे दीड-दोन वर्षांपासून संस्थेचे पदाधिकारी आपला हालहवाल लोकांपुढे पोटतिडकीने मांडत रकमेसाठी चालढकलपणा करीत आहेत. वर्ष उलटूनही अद्याप या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्याने या सहकारी पतपुरवठा संस्थेत पैसा गुंतवणे गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाहीना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. (क्रमश:)‘लाल’ झाले कोण?संस्थेलगत प्राचीन प्रसिद्ध लाल गणपतीचे मंदिर आहे. नेमके हेच नाव हेरून आणि भाविकांच्या आस्थेचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या अनुषंगाने संस्थेने ‘लाल गणपती’ या नावाने योजना आखली. पाच वर्षात दामदुप्पटीचे आमिषही नागरिकांना दाखविले. सन २००९-१० या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत शेकडो लोकांनी उड्या मारल्या. जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभताच सन २०१०-११ या वर्षात ‘चिंतामणी योजना’ जाहीर झाली. या योजनेवरही अनेकजण तुटून पडले. सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. पाच वर्ष संपले. ठेवीचे सहावे वर्षही सुरू झाले. परंतु दामदुप्पट रक्कम मिळाली नाही. सुमारे पाच कोटी रुपयांच्या आसपास या गुंतवणूकदारांना रक्कम परत करावयाची आहे. सोबतच यथाशक्ती मुदत ठेव योजनेतही एक, तीन आणि पाच वर्षांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली. ही रक्कमही अनेकांची संस्थेत अडकली आहे. अडकलेल्या रकमेचा हा गुंता संस्था सोडविणार कधी, असा सवाल शेकडो गुंतवणूकदार आता विचारीत आहेत. लोकमतविशेष