शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडच्या ‘सच्चिदानंद’ची पत घसरली

By admin | Updated: July 23, 2015 02:56 IST

बुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत.

अभय लांजेवार उमरेडबुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत. आपल्या घामाचा पैसा गुंतवल्यानंतर मुदतीअंती आपली रक्कम व्याजासह परत मागण्यासाठी अनेकजण या संस्थेच्या दोनमजली इमारतीत सध्या येरझाऱ्या मारीत आहेत. संस्थेत येणाऱ्यांना ‘सध्याच पैसे नाही, आणखी काही दिवस थांबा’ अशापद्धतीने थांबविले जाते. यामुळे आल्यापावलीच निराशेने परत जाण्याचा प्रकार गुंतवणूकदारांसोबत होत असून आपल्याच पैशासाठी अनेकदा चकरा मारणाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. तर दुसरीकडे संस्थेने जोरजबरदस्तीने ‘तारखेवर तारीख’ वाढवून देण्याचा सपाटाच सुरू केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. उमरेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या जात असून दुय्यम निबंधक ‘तुम्ही मला विचारून रक्कम ठेवली होती का’ अशा शब्दात आमची हेटाळणी करीत असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे.सुमारे दीड-दोन वर्षांपासून संस्थेचे पदाधिकारी आपला हालहवाल लोकांपुढे पोटतिडकीने मांडत रकमेसाठी चालढकलपणा करीत आहेत. वर्ष उलटूनही अद्याप या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्याने या सहकारी पतपुरवठा संस्थेत पैसा गुंतवणे गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाहीना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. (क्रमश:)‘लाल’ झाले कोण?संस्थेलगत प्राचीन प्रसिद्ध लाल गणपतीचे मंदिर आहे. नेमके हेच नाव हेरून आणि भाविकांच्या आस्थेचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या अनुषंगाने संस्थेने ‘लाल गणपती’ या नावाने योजना आखली. पाच वर्षात दामदुप्पटीचे आमिषही नागरिकांना दाखविले. सन २००९-१० या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत शेकडो लोकांनी उड्या मारल्या. जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभताच सन २०१०-११ या वर्षात ‘चिंतामणी योजना’ जाहीर झाली. या योजनेवरही अनेकजण तुटून पडले. सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. पाच वर्ष संपले. ठेवीचे सहावे वर्षही सुरू झाले. परंतु दामदुप्पट रक्कम मिळाली नाही. सुमारे पाच कोटी रुपयांच्या आसपास या गुंतवणूकदारांना रक्कम परत करावयाची आहे. सोबतच यथाशक्ती मुदत ठेव योजनेतही एक, तीन आणि पाच वर्षांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली. ही रक्कमही अनेकांची संस्थेत अडकली आहे. अडकलेल्या रकमेचा हा गुंता संस्था सोडविणार कधी, असा सवाल शेकडो गुंतवणूकदार आता विचारीत आहेत. लोकमतविशेष