शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘त्या’ भूपाळीने नागपूर जिल्ह्यातले उमरेड हरखून जायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:40 IST

‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न उमरेडकरांच्यासमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांच्या कीर्तनाचा रंग न्यारा काळाच्या ओघात प्रार्थनेतील संख्या रोडावली

अभय लांजेवार ।आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘मलयगिरीचा चंदन गंधीत, धूप तुला दाविला... स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा...’ कुमार गंधर्व यांच्या सुरेल, आवाजाच्या जादुई भूपाळीने त्या काळात चांगलीच मोहिनी घातली होती. उमरेडकरांचीही पहाट याच भूपाळीने होत असे. मंगळवारीपेठ येथील गुरुदेव सेवाश्रमाच्या भव्य परिसरातील उंच झाडाला ‘भोंगा’ बांधला होता. अगदी पहाटे ४ वाजताच या भोंग्यातून ‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. उमरेडच्या कानाकोपऱ्यात ही भूपाळी जेव्हा पोहचायची तेव्हा रस्त्यारस्त्यावर सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या जायच्या. ‘त्या’ आनंदी क्षणांचे आजही अनेकजण साक्षीदार आहेत.दंग सदावर्ती, बालाजी चौधरी, सुखदेव किन्नाके, लक्ष्मण तारणेकर, वामन मुडपल्लीवार आणि मनोहर सदावर्ती यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांनी स्वत: उमरेड शहरात ‘गुरुदेव सेवाश्रम’ सुरू केला. होळकर गुरुजींचा हा शानदार वाडा पूर्वी ‘देवराज आश्रम’ म्हणून ओळखला जायचा. रोज सकाळी ध्यान आणि सायंकाळी सामूहिक प्रार्थनेसाठी लोकं येथे गोळा होऊ लागले. आजही नित्यनेमाने याठिकाणी ध्यान आणि प्रार्थना सुरूच आहे. केवळ माणसांची संख्या तेवढी रोडावली.अडगळीच्या एका खोलीत सध्या ध्यान आणि प्रार्थना होत असते. शिवाय, आताही मोठ्या झाडाला भोंगा अडकवलेला दिसतो. भोंगा वाजविणारे साहित्यही आहे. परंतु, ते निकामी झाले आहे. पुनश्च ‘उठी उठी गोपाळा’चे ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न त्यांच्या अनुयायांसमोर उभा ठाकला आहे.

राष्ट्रसंतांचा सेवाश्रमातच मुक्कामसन १९५७ नंतर राष्ट्रसंत जेव्हा या परिसरात कीर्तनासाठी येत असत, त्यावेळी ते या सेवाश्रमात मुक्कामी असायचे. सोबतच त्यावेळेस दहा ते बारा वेळा तुकडोजी महाराजांच्या कीर्तनाचा लाभ उमरेडकरांना मिळाला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या ‘शेतकरी’ या गंभीर विषयावर ‘त्या’ काळात (आज कुणीच बोलत नाही) महाराज पोटतिडकीने बोलत, जनजागृती करत. दारूबंदी, ग्रामस्वच्छता, विज्ञान, अध्यात्म, देशसेवा असे सर्वसमावेशक विषय ते हाताळत. ‘माणूस’ हा त्यांच्या कीर्तनाचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचा ‘रंगच न्यारा’ अशा जुन्या तेवढ्याच ताज्या आठवणी नामदेव राऊत, पंजाबराव आंभोरे मोठ्या उत्सुकतेने आजही व्यक्त करतात.पूर्णाकृती पुतळा११ आॅक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंतांच्या निधनाची वार्ता या परिसरात जेव्हा पोहचली तेव्हा सारेच हळहळले. त्यांच्या अंत्यविधीसाठी दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे असल्याने अनेकांनी रात्र जागून काढल्याचे दादाभाऊ नक्षिणे यांनी सांगितले. कालांतराने या सेवाश्रम परिसरात माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, नामदेव राऊत, पंजाबराव आंभोरे यांच्या पुढाकारातून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा साकारला गेला. अवतीभवती उंच वृक्षवल्लींमुळे हा परिसर अधिकच नयनरम्य झाला. या परिसराचा ‘विकास’ झाला पाहिजे आणि अधिकांश लोकांनी याकामी पुढाकार घ्यायला हवा, असा विचारप्रवाह पुढे येत आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक